जन्म एका परिवारात सांभाळ दुसऱ्याच परिवारात आणि थकलेल्या जिवाने आता तिसऱ्या परिवारात आडोसा घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. कार्यकर्ता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेल्या नेत्याला राजकीय ग्रहण लागलेले पाहायला मिळणे हि दुर्दैवाची गोष्ट आहे. कोकणपट्ट्यातलं परवलीचं नाव म्हणून सुरवातीच्या काळात पुढं आलं नंतर जातीच्या आधारे थेट मुख्यमंत्रीच. नारायण राणे हे शिवसेनेतुन राजकीय नेते म्हणून जन्माला आले. युती सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री म्हणून कार्यरत होते. १ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर जुलै २००५ पर्यंत शिवसेनेत राहिले आणि नंतर मात्र काँग्रेसच्या आडोश्याला जाण्याचं पाप केलं. पुढं दोन्ही मुलांना आपल्या हाताला धरून राजकारणात आणून सोडलं. आता निलेश राणे व नितेश राणे हेदेखील तोलामोलाच्या राजकारणात आहेत. महाराष्ट्रातील वजनदार नेत्यांमध्ये घेतले जाणाऱ्या नावाचे कालांतराने हसे झाले. कोकणातील सर्वांत जास्त जनपाठिंबा असलेले नेते, आक्रमक भाषाशैली, आणि महाराष्ट्रातील ताकदीचे नेते म्हणून असलेली त्यांची ओळख आता कित्येक पावसाळे सोसून झडलेल्या छत्रीप्रमाणे झालीय. आठवण म्हणून माचोळीला सांभाळत ठेवायची कि रहदारीच्या खोलीत शोकेसमध्ये एवढाच प्रश्नय आता.
शिवसेनेतून बाहेर पडलेल्या या नेत्याने काँग्रेसवर तरी कुठे मनापासून प्रेम केलं होतं! अवघ्या दोन वर्षात म्हणजे दोन हजार आठ साली पक्षविरोधी कारवाया केल्याचा डाग माथी बसलाय. नंतर प्रहारासारखे वृत्तपत्र चालवलं. तेवढ्यावरच थांबले नाहीत तर पुन्हा दोन हजार नऊला काँग्रेसच्या विरोधात जाहीर विधाने केल्याने निलंबनाची शाब्बासकी घेतली. माफी, दिलगिरी करून मग कारवाई मागे घेण्यात आल्याचा इतिहास तर साक्ष देतोय. त्यानंतर मात्र पुन्हा जाऊ तिथे खाऊ याप्रमाणे महसूलमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली.
एवढं सगळ असताना गेल्या तीन- चार वर्षात त्यांना मोठ्या राजकीय ग्रहणाला तोंड द्यावं लागतंय. मोदी लाटेने हिंदकळलेल्या पक्षांसोबत रसातळाला गेलेले राजकीय भवितव्य घेऊन तीन चार वेळा प्रायचीत्य भोगावं लागलं. हे पाप केवळ त्यांनी केलेल्या राजकारणाचं आहे. आता भाजपामय प्रवास सुखकर व्हावा यासाठी भूकंप करण्याच्या बेतात असल्याचं ऐकायला मिळतंय. वाल्याचा वाल्मिकी करण्याचा प्रयत्न भाजपा करेलही मात्र त्या वाल्मिकीने नव्याने वादळाशी दोस्ती करताना आपले भवितव्य उज्वल आणि शाबित होणार नाही याची काळजी घ्यावी. भाजपा अंत्योदय घटकाचा विकास म्हणून सर्वाना सामावून घेईलही मात्र इतिहास सांगतोय कि या नेत्याने आपले बुड इथे कायमस्वरूपी टेकवले का हे कसे कळणार.... मात्र कणकवलीपासून, कोकणमार्गे महाराष्ट्रात राणे वाल्मिकी होण्याने काही भूकंप वगैरे अजिबात होणार नाही. बाकी आओ साथ चले.. मंजिल तक जाना है... आणि सबका साथ वगैरे वगैरे सगळं ठिकाय. खूप शुभेच्छा.
©विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱8379977650
तपशील साभार- गुगल
शिवसेनेतून बाहेर पडलेल्या या नेत्याने काँग्रेसवर तरी कुठे मनापासून प्रेम केलं होतं! अवघ्या दोन वर्षात म्हणजे दोन हजार आठ साली पक्षविरोधी कारवाया केल्याचा डाग माथी बसलाय. नंतर प्रहारासारखे वृत्तपत्र चालवलं. तेवढ्यावरच थांबले नाहीत तर पुन्हा दोन हजार नऊला काँग्रेसच्या विरोधात जाहीर विधाने केल्याने निलंबनाची शाब्बासकी घेतली. माफी, दिलगिरी करून मग कारवाई मागे घेण्यात आल्याचा इतिहास तर साक्ष देतोय. त्यानंतर मात्र पुन्हा जाऊ तिथे खाऊ याप्रमाणे महसूलमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली.
एवढं सगळ असताना गेल्या तीन- चार वर्षात त्यांना मोठ्या राजकीय ग्रहणाला तोंड द्यावं लागतंय. मोदी लाटेने हिंदकळलेल्या पक्षांसोबत रसातळाला गेलेले राजकीय भवितव्य घेऊन तीन चार वेळा प्रायचीत्य भोगावं लागलं. हे पाप केवळ त्यांनी केलेल्या राजकारणाचं आहे. आता भाजपामय प्रवास सुखकर व्हावा यासाठी भूकंप करण्याच्या बेतात असल्याचं ऐकायला मिळतंय. वाल्याचा वाल्मिकी करण्याचा प्रयत्न भाजपा करेलही मात्र त्या वाल्मिकीने नव्याने वादळाशी दोस्ती करताना आपले भवितव्य उज्वल आणि शाबित होणार नाही याची काळजी घ्यावी. भाजपा अंत्योदय घटकाचा विकास म्हणून सर्वाना सामावून घेईलही मात्र इतिहास सांगतोय कि या नेत्याने आपले बुड इथे कायमस्वरूपी टेकवले का हे कसे कळणार.... मात्र कणकवलीपासून, कोकणमार्गे महाराष्ट्रात राणे वाल्मिकी होण्याने काही भूकंप वगैरे अजिबात होणार नाही. बाकी आओ साथ चले.. मंजिल तक जाना है... आणि सबका साथ वगैरे वगैरे सगळं ठिकाय. खूप शुभेच्छा.
©विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱8379977650
तपशील साभार- गुगल



