इडा पीडा टळू दे,
बळीचे राज्य येऊ दे...
असा आर्जव करणाऱ्या सह्याद्रीच्या कुशीतल्या महाराष्ट्रा तुझ्या पोटी जन्माला आलेल्या माझ्या उपवर होत असलेल्या भगिणीला शेतकऱ्यांच्या दळभद्री जगण्याच्या यातना छळताहेत। काकाने आत्महत्या केली उद्या बाप मरेल म्हणून लग्नाला आलेली एक बहीण हकनाक गेली। कोणत्या परिवर्तनाची वाट पाहतोय आपण। अरे ज्या बापानं शेतीसाठी अख्खा जलम मातीत पुरला, फाटका धोतराचा सोगा अन एक काळवंडलेली बंडी घालून काळ्या भुईत समरस झाला। कधी पावसानं जाच केला तर कधी सरकारनं, कधी माणसांनी काळजाला वार केला तर कधी आपल्याच कर्मानं। किती बळी गेले? कुणासाठी गेले? कशासाठी गेले? आणि का गेले? याचे उत्तर देण्याची लाज वाटते। शेतकरी कर्जमाफीने माझ्या बापाला स्वातंत्र्य मिळणार नाही माझ्या बापाला जगणं आनंदी करायचं असेल तर सरकार बापाच्या मातीला माय मानाला शिका। कर्जमाफी ही मलमपट्टी आहे ऑपरेशन तर हमीभाव आहे। प्रश्न इथे नाही संपत इथे तर सुरुवात होते।
मोर्चे, आंदोलन, निषेध कुणासाठी काढू? बापाच्या सन्मानासाठी? जगणं मंजूर करण्यासाठी? माझ्या मातीच्या लेकरांच्या हमीभावासाठी? गेलेल्या बहिणीला न्याय देण्यासाठी? तमाम बळीराजाला दोरीतून मुक्त करा यासाठी?
कित्ती भयाण वास्तवय, नेटवर्किंग स्पीड अन जगण्याची नवी नवी पायवाट समोर येत असताना मातीत जाणाऱ्या पिढ्या कुणाकडे करणार आर्जव? ज्या बहिणीने कर्ज काढायला लागू नये म्हणून सगळंच संपवून टाकलं न तिला विचारा न बापाला काय यातना होत्या। जगणं रस्त्यावर नाही भावांनो। इतकं उदार, निराश सहज नसतं होता येत। ज्याच्या घराला आग लागते न त्याला कळतं घर बांधायला काय यातना झाल्या होत्या। अरे अवघ्या बारावीत शिकणाऱ्या एका बहिणीने बापासाठी जगणं उधळून दिलं। परभणी जिल्ह्यातल्या जवळाझुटातल्या कर्जबाजारी व नापिकीमुळे वडिलांच्या आत्महत्येच्या भितीने सारिका झुटे या भगिणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या आता मला धक्कादायक नाही वाटत पण त्यासाठी केली न ते काळीज कापत जाणारं वास्तवय।
उन्हातानात कष्ट करून पैसा पैसा जमवला अन मग मातीची ओटी भरली मात्र पावसाला अजून ओल वाटेना। वावरात पीक जळत असताना मनात बाप जळतो। ते जळण कुणाच्या नावानं नाही सरकार, तुमच्या तर अजिबात नाही पण जगण्याच्या तळमळीला आर्जव करताना मनात जळताना बाप हाय लागून कधी जातो हे कुणालाच समजत नाही। कालपरवापर्यंत बापाची हाय लेकापर्यंत आली होती आता लेकीपर्यंत आलीय।
हे भयाण सगळं वास्तव कळतं एसीपासून थेट सगळ्याच साहेबाला पण वळत नाही, हाच मुद्दाय।
©विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱8379977650
बळीचे राज्य येऊ दे...
असा आर्जव करणाऱ्या सह्याद्रीच्या कुशीतल्या महाराष्ट्रा तुझ्या पोटी जन्माला आलेल्या माझ्या उपवर होत असलेल्या भगिणीला शेतकऱ्यांच्या दळभद्री जगण्याच्या यातना छळताहेत। काकाने आत्महत्या केली उद्या बाप मरेल म्हणून लग्नाला आलेली एक बहीण हकनाक गेली। कोणत्या परिवर्तनाची वाट पाहतोय आपण। अरे ज्या बापानं शेतीसाठी अख्खा जलम मातीत पुरला, फाटका धोतराचा सोगा अन एक काळवंडलेली बंडी घालून काळ्या भुईत समरस झाला। कधी पावसानं जाच केला तर कधी सरकारनं, कधी माणसांनी काळजाला वार केला तर कधी आपल्याच कर्मानं। किती बळी गेले? कुणासाठी गेले? कशासाठी गेले? आणि का गेले? याचे उत्तर देण्याची लाज वाटते। शेतकरी कर्जमाफीने माझ्या बापाला स्वातंत्र्य मिळणार नाही माझ्या बापाला जगणं आनंदी करायचं असेल तर सरकार बापाच्या मातीला माय मानाला शिका। कर्जमाफी ही मलमपट्टी आहे ऑपरेशन तर हमीभाव आहे। प्रश्न इथे नाही संपत इथे तर सुरुवात होते।
मोर्चे, आंदोलन, निषेध कुणासाठी काढू? बापाच्या सन्मानासाठी? जगणं मंजूर करण्यासाठी? माझ्या मातीच्या लेकरांच्या हमीभावासाठी? गेलेल्या बहिणीला न्याय देण्यासाठी? तमाम बळीराजाला दोरीतून मुक्त करा यासाठी?
कित्ती भयाण वास्तवय, नेटवर्किंग स्पीड अन जगण्याची नवी नवी पायवाट समोर येत असताना मातीत जाणाऱ्या पिढ्या कुणाकडे करणार आर्जव? ज्या बहिणीने कर्ज काढायला लागू नये म्हणून सगळंच संपवून टाकलं न तिला विचारा न बापाला काय यातना होत्या। जगणं रस्त्यावर नाही भावांनो। इतकं उदार, निराश सहज नसतं होता येत। ज्याच्या घराला आग लागते न त्याला कळतं घर बांधायला काय यातना झाल्या होत्या। अरे अवघ्या बारावीत शिकणाऱ्या एका बहिणीने बापासाठी जगणं उधळून दिलं। परभणी जिल्ह्यातल्या जवळाझुटातल्या कर्जबाजारी व नापिकीमुळे वडिलांच्या आत्महत्येच्या भितीने सारिका झुटे या भगिणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या आता मला धक्कादायक नाही वाटत पण त्यासाठी केली न ते काळीज कापत जाणारं वास्तवय।
उन्हातानात कष्ट करून पैसा पैसा जमवला अन मग मातीची ओटी भरली मात्र पावसाला अजून ओल वाटेना। वावरात पीक जळत असताना मनात बाप जळतो। ते जळण कुणाच्या नावानं नाही सरकार, तुमच्या तर अजिबात नाही पण जगण्याच्या तळमळीला आर्जव करताना मनात जळताना बाप हाय लागून कधी जातो हे कुणालाच समजत नाही। कालपरवापर्यंत बापाची हाय लेकापर्यंत आली होती आता लेकीपर्यंत आलीय।
हे भयाण सगळं वास्तव कळतं एसीपासून थेट सगळ्याच साहेबाला पण वळत नाही, हाच मुद्दाय।
©विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱8379977650

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा