शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०१८

श्रद्धांजली निमित्ताने.....

धर्मा पाटील गेल्याची बातमी वाचली अन क्षणभर डोळ्यासमोर अंधार पसरला। कोणतंही सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचं नसतं, विरोधात राहूनच त्यांच्याकडून काम करून घ्यावं लागतं हे वाचलंय. शेताभातात राबणारा धर्मा पाटील नावाचा 80 वर्षाचा शेतकरी सरकारच्या दखल न घेण्यामुळे आत्महत्या करून देवाघरी गेला. शेताभातात राबणाऱ्या बापाला नव्या इंडियाचं स्वप्न दाखवलं गेलं। अर्थात ते वाईट नसेलही मात्र त्यामार्फत सरकार करत असलेली कार्यवाही ही हरामखोर अधिकाऱ्यांच्या तकलादू भूमिकेमुळे शेतकऱ्यांच्या जीवावर उठली. धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा विखरण इथला हाडाची काडं झालेला शेतकरी बाप मंत्रालयात कित्येक हेलपाटे घालून थकला. सरकारनं सौर ऊर्जा प्रकल आणला आणि शेती संपादित केली. चार पट मोबदला देतो म्हणणाऱ्या औलादी एक पटही देऊ शकल्या नाहीत. 5 एकर जमिनीचे केवळ 4 लाख रुपये हातावर टेकवले गेले। 80 वर्षीय शेतकरी बाप मंत्रालयाच्या वाऱ्या करतोय, सुसंस्कारित सरकार मात्र शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांती करणार म्हणत योजना आखत असताना प्रशासनातील मुजोर अधिकारी असतील किंवा मुख्य शासनाचे भाट असतील यांनी शेतकरी माय बाप, मजूर, कष्टकरी समाजाला कायम होरपळत ठेवलं। आज धर्मा पाटील गेले हे वाचलं आणि डोळे भरून वाहायला लागले। शरद जोशींनी सांगितलं होतं हा कष्टकरी आणि एक दाण्याचे हजार दाणे करणारा आमचा बाप योद्धा शेतकरी म्हणून जगला पाहिजे। पण या व्यवस्थेला जर शेतकरी बळीच घ्यायचा असेल, शेतकऱ्यांना सन्मान घायचाच नसेल तर काय? सरकार कार्यवाही करताना कमी पडत असेल तर काय? 80 वर्षाच्या धर्मा पाटील नावाच्या शेतकऱ्याला मंत्रालय दरबारी न्याय मिळत नाही, दखल घेतली जात नाही म्हणून आत्महत्या करावी लागते यापेक्षा या कृषिप्रधान देशात दुर्दैव काय असू शकते?
मावळच्या ऊसदर आंदोलनात घातलेली गोळी आणि आता धर्मा पाटील यांनी केलेली आत्महत्या माझ्यासारखा शेताभातात राबणाऱ्यांच्या पोटी जन्माला आलेला किसानपुत्र एकाच तराजूत तोलतो, आणि ते तोललंच पाहिजे। धर्मा पाटील हे एक नाहीत हजार असे गेले पण आता जाग यायला हवीय. मी निषेध कुणा कुणाचा करू? सरकारचा करू? सरकारी भाटांचा करू? अधिकाऱ्यांचा करु की या गांडू व्यवस्थेचा करू......😑😑😑😑

© विकास विठोबा वाघमारे
सोलापूर

मागल्या रांगेतून..

पिढ्यानपिढ्या घराणेशाहीच्या नावाखाली गुजराण करणाऱ्या आणि देशाला खाईत लोटणाऱ्या तथाकथित पिढीजात नेत्याला कुणी मोदी नावाच्या फकीरानं आणि चहा विकण्याची लायकी असणाऱ्याने मागे बसवलं म्हणून किती मोठा आगडोंब उसळला. ७० वर्ष आपण ज्या देशामध्ये राजसत्ता भोगली त्या मातीतला शेतकरी बाप अजून बांधावर उघडा नागडा का फिरतो ? बांधाबांधावर संघर्ष जन्माला येतो आणि झडत चाललेल्या बाभळीला का संपतो ? जिथं अखंड सत्ता मिळते त्या देशात हजारो कोटींच्या घोटाळ्याशिवाय दुसरं काहीच कर्तृत्व न करू शकलेल्या जातीवादी आणि लुटारुंच्या भाटांनो आपल्या बापजाद्यांनी केलेल्या कॉंक्रेटीकरणावर अजून किती काळ आपण फक्त डांबर टाकून रस्ता नवा कोरा असल्याची आन घेणार आहात.

प्रजासत्ताक दिन सोहळा हा कुणाच्या बापाच्या मालकीचा नव्हता म्हणजे अर्थात आपण कुठे बसायचं हे मनी बाळगणं किंवा भाटांना बाळगायला लावणं कितपत योग्य आहे ? एखाद्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होणं आणि तेही खूप कष्ट करून त्या उच्च पदावर पोहोचणं, आदर्श वगेरे घ्यावा असं काही असेल तर त्याच्या सन्मानासाठी अखंड देश एकवटला असता मात्र शून्य कर्तृत्वावर उपटसुंब टोळधाड किती उर बडवून घेतीय याचं नवल वाटतंय. मोदी नीच आहेत असं तुम्हाला वाटतं. तर मोदी नीच असतीलही हे आम्ही मान्य करू. एखाद्या सत्तेमध्ये समस्त जनता कधीच खुश नसते आणि नसायला हवी म्हणून तर सत्ता परिवर्तन होत असते. लोकशाही टिकून राहते. मात्र नीच असलेल्या मोदींनी या देशातल्या एकेकाळी देशाला प्रचंड लुटलेल्या आणि मोठ्या असलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला सहाव्या ओळीत बसवून कुवतीप्रमाणे लायकीवर आणले हे काही कमी नाही. चायवाला म्हणून हिनवताना, त्यांच्या गरिबीची चेष्टा करताना, सामान्य माणसांच्या यातना जवळून बघताना डोळे भरून आलेला पंतप्रधान बाप्या म्हणताना आणि खानदानी दुकानदारी उलथापालथ केली म्हणून आपले गटार गलिच्छ संस्कार दाखवून देताना आपण किती खालच्या पातळीचे राजकारण केले याचं भान ना त्या तथाकथित अध्यक्षांना ना भाटांना येईल ना बाजारबुनग्या टोळधाडीला....

या सगळ्यावर नूतनकुमार पाटणी यांच्या ओळी इथं आठवतात.

"ऐ मेरे दोस्त,तकदीर की लकिरमे फकिरभी राज-ए-बाज बन जाता है l
खेल मदारिक घडी दो घड़िकाही होता है ll"

....आणि तरीही या सगळ्याचं उत्तर मो तर एवढंच देईन की

"समय बडा पहेलवान है ll"

© विकास विठोबा वाघमारे
सोलापूर

पुन्हाच्या निमित्ताने...


😉आम्ही ठरवू ते आरोपी. आम्ही सांगू ते वाईट, आम्ही बोलू ते पूर्व. आम्ही सांगू ते सत्य. अशी भाषा हल्ली बोलू लागलेत नक्षलवादी प्रवृत्ती जोपासणारे नेते. मुळात मला बातमी वाचल्यानंतर थोडं चलबिचल झालं “भिडे, एकबोटेना अटक न झाल्यास पुन्हा हिंसाचार”.
आम्ही दंगल घडवलीच नाही. दंगल ही हिंदुत्ववाद्यांनी घडवली आणि तेही आम्ही जी नावे सांगतो त्यांनीच घडवली अशी कुबाड रचत मागच्या रांगेतून पुढ येऊन तथाकथित दलितांचा नेता होऊ पाहणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना आपण काय बोलतोय याचं भान राहिलेलं दिसत नाही किंवा सत्य सांगताहेत.
जर तुम्ही दंगल घडवलीच नसेल, तुमचा त्यात हातच नसेल, यल्गार सभेतील सर्व तथाकथित मान्यवर (?) जर धुतल्या तांदळाचे असतील तर “पुन्हा” शब्दाचा अर्थ काय होतो हे एकदा या महाराष्ट्रातील भोळ्या भाबड्या जनतेला सांगा. जर दलितांचा नेता व्हायचं असेल तर बाबासाहेबांच्या विचारांचा पाईक होऊन समृद्ध आणि सुसंस्कारित समाज घडवण्याची शपथ घ्या. सामाजिक कलह निर्माण करून नेता होता येत नसतं. ते म्हणजे तीन काठ्यावर एक मडकं ५ – ६ फुट उंचीवर उभं करून खाली जाळ घालून शिजण्याची वाट बघण्यासारखं आहे. ते शिजतही नाही आणि भिजतही नाही. तो जाळ वाऱ्याने रानभर पसरतो आणि मग अंगलोट येतो काळसर धूर.... हे चपखल ध्यानात घ्या.
पुन्हा हिंसाचार करू म्हणजे पूर्वीही आम्हीच केला, आताही अजून करू असा सरळ, साधा, सोपा अर्थ होतो. तमाम दलितांना आणि जनसामान्य जनतेला गृहीत धरू नका. कायदेशीर कारवाई झाली तर चौकशी होईलच. तुम्ही मागणी करणं बरोबर आहे मात्र अशी विधानं करून पुन्हा समाज चेतवण्याचा प्रयत्न नका करू, ते आंबेडकर आडनावाला शोभणारं नाही.



_ विकास वाघमारे