पिढ्यानपिढ्या घराणेशाहीच्या नावाखाली गुजराण करणाऱ्या आणि देशाला खाईत लोटणाऱ्या तथाकथित पिढीजात नेत्याला कुणी मोदी नावाच्या फकीरानं आणि चहा विकण्याची लायकी असणाऱ्याने मागे बसवलं म्हणून किती मोठा आगडोंब उसळला. ७० वर्ष आपण ज्या देशामध्ये राजसत्ता भोगली त्या मातीतला शेतकरी बाप अजून बांधावर उघडा नागडा का फिरतो ? बांधाबांधावर संघर्ष जन्माला येतो आणि झडत चाललेल्या बाभळीला का संपतो ? जिथं अखंड सत्ता मिळते त्या देशात हजारो कोटींच्या घोटाळ्याशिवाय दुसरं काहीच कर्तृत्व न करू शकलेल्या जातीवादी आणि लुटारुंच्या भाटांनो आपल्या बापजाद्यांनी केलेल्या कॉंक्रेटीकरणावर अजून किती काळ आपण फक्त डांबर टाकून रस्ता नवा कोरा असल्याची आन घेणार आहात.
प्रजासत्ताक दिन सोहळा हा कुणाच्या बापाच्या मालकीचा नव्हता म्हणजे अर्थात आपण कुठे बसायचं हे मनी बाळगणं किंवा भाटांना बाळगायला लावणं कितपत योग्य आहे ? एखाद्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होणं आणि तेही खूप कष्ट करून त्या उच्च पदावर पोहोचणं, आदर्श वगेरे घ्यावा असं काही असेल तर त्याच्या सन्मानासाठी अखंड देश एकवटला असता मात्र शून्य कर्तृत्वावर उपटसुंब टोळधाड किती उर बडवून घेतीय याचं नवल वाटतंय. मोदी नीच आहेत असं तुम्हाला वाटतं. तर मोदी नीच असतीलही हे आम्ही मान्य करू. एखाद्या सत्तेमध्ये समस्त जनता कधीच खुश नसते आणि नसायला हवी म्हणून तर सत्ता परिवर्तन होत असते. लोकशाही टिकून राहते. मात्र नीच असलेल्या मोदींनी या देशातल्या एकेकाळी देशाला प्रचंड लुटलेल्या आणि मोठ्या असलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला सहाव्या ओळीत बसवून कुवतीप्रमाणे लायकीवर आणले हे काही कमी नाही. चायवाला म्हणून हिनवताना, त्यांच्या गरिबीची चेष्टा करताना, सामान्य माणसांच्या यातना जवळून बघताना डोळे भरून आलेला पंतप्रधान बाप्या म्हणताना आणि खानदानी दुकानदारी उलथापालथ केली म्हणून आपले गटार गलिच्छ संस्कार दाखवून देताना आपण किती खालच्या पातळीचे राजकारण केले याचं भान ना त्या तथाकथित अध्यक्षांना ना भाटांना येईल ना बाजारबुनग्या टोळधाडीला....
या सगळ्यावर नूतनकुमार पाटणी यांच्या ओळी इथं आठवतात.
"ऐ मेरे दोस्त,तकदीर की लकिरमे फकिरभी राज-ए-बाज बन जाता है l
खेल मदारिक घडी दो घड़िकाही होता है ll"
....आणि तरीही या सगळ्याचं उत्तर मो तर एवढंच देईन की
"समय बडा पहेलवान है ll"
© विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
प्रजासत्ताक दिन सोहळा हा कुणाच्या बापाच्या मालकीचा नव्हता म्हणजे अर्थात आपण कुठे बसायचं हे मनी बाळगणं किंवा भाटांना बाळगायला लावणं कितपत योग्य आहे ? एखाद्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होणं आणि तेही खूप कष्ट करून त्या उच्च पदावर पोहोचणं, आदर्श वगेरे घ्यावा असं काही असेल तर त्याच्या सन्मानासाठी अखंड देश एकवटला असता मात्र शून्य कर्तृत्वावर उपटसुंब टोळधाड किती उर बडवून घेतीय याचं नवल वाटतंय. मोदी नीच आहेत असं तुम्हाला वाटतं. तर मोदी नीच असतीलही हे आम्ही मान्य करू. एखाद्या सत्तेमध्ये समस्त जनता कधीच खुश नसते आणि नसायला हवी म्हणून तर सत्ता परिवर्तन होत असते. लोकशाही टिकून राहते. मात्र नीच असलेल्या मोदींनी या देशातल्या एकेकाळी देशाला प्रचंड लुटलेल्या आणि मोठ्या असलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला सहाव्या ओळीत बसवून कुवतीप्रमाणे लायकीवर आणले हे काही कमी नाही. चायवाला म्हणून हिनवताना, त्यांच्या गरिबीची चेष्टा करताना, सामान्य माणसांच्या यातना जवळून बघताना डोळे भरून आलेला पंतप्रधान बाप्या म्हणताना आणि खानदानी दुकानदारी उलथापालथ केली म्हणून आपले गटार गलिच्छ संस्कार दाखवून देताना आपण किती खालच्या पातळीचे राजकारण केले याचं भान ना त्या तथाकथित अध्यक्षांना ना भाटांना येईल ना बाजारबुनग्या टोळधाडीला....
या सगळ्यावर नूतनकुमार पाटणी यांच्या ओळी इथं आठवतात.
"ऐ मेरे दोस्त,तकदीर की लकिरमे फकिरभी राज-ए-बाज बन जाता है l
खेल मदारिक घडी दो घड़िकाही होता है ll"
....आणि तरीही या सगळ्याचं उत्तर मो तर एवढंच देईन की
"समय बडा पहेलवान है ll"
© विकास विठोबा वाघमारे
सोलापूर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा