आज भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून गणला जात असताना शिवसेना कुठेतरी मागे पडतीय का हा प्रश्न सुद्धा सेनाप्रमुखांनी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
मराठी माणसांसाठी शिवसेनाच असं म्हणत असताना आणि मराठीच्या मुद्द्यावर राजकीय खलबते करत असताना भारतीय जनता पार्टीला तब्बल 82 जागा मिळतात हे कसं शक्य आहे?
मराठी अन हिंदुत्व यावर शिवसेनेने आपला राजकीय आवाका वाढवला. कधीकाळी छोटा भाऊ म्हणून भाजपाला अंगाखांद्यावर घेतलं. आता मोठ्या - छोट्या म्हणत जागांसाठी युती तोडली.
मात्र आज मुंबईचे राजकारण मराठी अन हिंदुत्वाभोवती नाही का हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचे आहे. कारण भाजपा हिंदुत्ववादी आहे मात्र मराठी अन बाकी अस्मिता नाही अन मुंबई वाचवायची असेल तर सेनाच बरी असाही आटापिटा बऱ्याच जणांनी केला होता.
आता निकाल हाती आल्यानंतर भाजपाने थेट शिवसेनेला आणि तेही स्वगृही म्हणजे मुंबई जाऊन धोबीपछाड केले आहे याचा विचार आता सेनेने करणे गरजेचे आहे. कारण 25 वर्षे एकहाती सत्ता भोगणाऱ्या सेनेला भाजपाने चित करणे म्हणजे भाजपाचा विजय तर आहेच पण सेनेचा पराभव आहे हे अत्यंत महत्वाचे आहे.
एकूणच काय तर सेनेला मुंबईत सुद्धा आता ग्रहण लागलं आहे त्यामुळे भाजपाला आता छोटा भाऊ, कमळाबाई म्हणून हिणवत बसण्यापेक्षा त्यांच्याच ताटात अर्धीच्या ऐवजी चतकोर का होईना भाकरी खाणे आज गरजेचे आहे.
मनसेच्या इंजिनाला टाळी दिली असती तर कदाचित चित्र थोडंसं वेगळे दिसले असते मात्र तेही मोठेपणाचा अहंकाराने झिडकारले. आता मात्र नेतृत्वाने कुठेतरी विचार करण्याची गरज आली आहे, शिवसेना बाळासाहेबांची आहे आणि ती तशीच रहावी यासाठी प्रयत्न करावे लागतील.
गुजरातच्या पाटीदार समाजाच्या हार्दिक पटेल या युवकाला मुंबईत आणून भाजपाला व भाजपा श्रेष्ठींना शह देण्याचा प्रयत्न झाला, गुजराती मतांचा आकडा आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला गेला मात्र ही खेळी सेनेच्या अंगलट आली म्हणायला हरकत नाही.
काँग्रेसचा पराभव निश्चित होताच, राष्ट्रवादी, मनसे यांचाही काहीअंशी परिणाम जाणवला मात्र मुंबईच्या राजकारणात फार काही तो प्रभावी दिसला नाही.
मुंबईसाठी महाराष्ट्रात इतरत्र कुठेही सभा न घेता दिवसरात्र एक करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना भाजपाने नमवलं असंही म्हणायला हरकत नाही. भाजपाला मुंबईत मोठ्या प्रमाणात जागा मिळणे म्हणजे शिवसेनेचा पराभव आहे हे निश्चित..!
©Vikas Waghamare
मराठी माणसांसाठी शिवसेनाच असं म्हणत असताना आणि मराठीच्या मुद्द्यावर राजकीय खलबते करत असताना भारतीय जनता पार्टीला तब्बल 82 जागा मिळतात हे कसं शक्य आहे?
मराठी अन हिंदुत्व यावर शिवसेनेने आपला राजकीय आवाका वाढवला. कधीकाळी छोटा भाऊ म्हणून भाजपाला अंगाखांद्यावर घेतलं. आता मोठ्या - छोट्या म्हणत जागांसाठी युती तोडली.
मात्र आज मुंबईचे राजकारण मराठी अन हिंदुत्वाभोवती नाही का हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचे आहे. कारण भाजपा हिंदुत्ववादी आहे मात्र मराठी अन बाकी अस्मिता नाही अन मुंबई वाचवायची असेल तर सेनाच बरी असाही आटापिटा बऱ्याच जणांनी केला होता.
आता निकाल हाती आल्यानंतर भाजपाने थेट शिवसेनेला आणि तेही स्वगृही म्हणजे मुंबई जाऊन धोबीपछाड केले आहे याचा विचार आता सेनेने करणे गरजेचे आहे. कारण 25 वर्षे एकहाती सत्ता भोगणाऱ्या सेनेला भाजपाने चित करणे म्हणजे भाजपाचा विजय तर आहेच पण सेनेचा पराभव आहे हे अत्यंत महत्वाचे आहे.
एकूणच काय तर सेनेला मुंबईत सुद्धा आता ग्रहण लागलं आहे त्यामुळे भाजपाला आता छोटा भाऊ, कमळाबाई म्हणून हिणवत बसण्यापेक्षा त्यांच्याच ताटात अर्धीच्या ऐवजी चतकोर का होईना भाकरी खाणे आज गरजेचे आहे.
मनसेच्या इंजिनाला टाळी दिली असती तर कदाचित चित्र थोडंसं वेगळे दिसले असते मात्र तेही मोठेपणाचा अहंकाराने झिडकारले. आता मात्र नेतृत्वाने कुठेतरी विचार करण्याची गरज आली आहे, शिवसेना बाळासाहेबांची आहे आणि ती तशीच रहावी यासाठी प्रयत्न करावे लागतील.
गुजरातच्या पाटीदार समाजाच्या हार्दिक पटेल या युवकाला मुंबईत आणून भाजपाला व भाजपा श्रेष्ठींना शह देण्याचा प्रयत्न झाला, गुजराती मतांचा आकडा आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला गेला मात्र ही खेळी सेनेच्या अंगलट आली म्हणायला हरकत नाही.
काँग्रेसचा पराभव निश्चित होताच, राष्ट्रवादी, मनसे यांचाही काहीअंशी परिणाम जाणवला मात्र मुंबईच्या राजकारणात फार काही तो प्रभावी दिसला नाही.
मुंबईसाठी महाराष्ट्रात इतरत्र कुठेही सभा न घेता दिवसरात्र एक करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना भाजपाने नमवलं असंही म्हणायला हरकत नाही. भाजपाला मुंबईत मोठ्या प्रमाणात जागा मिळणे म्हणजे शिवसेनेचा पराभव आहे हे निश्चित..!
©Vikas Waghamare





