रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७

स्वाभिमानी नेत्याचा निषेध..!

देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या पत्नींवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार श्री. प्रशांत परिचारक यांची टीका करताना जीभ घसरली.

जे झालं ते वाईट झालं, जे बोललो ते वाईट बोललो, या वाक्याबद्दल महाराष्ट्राची व तमाम जनतेची दिलगीरी व्यक्त करतो असे आ. प्रशांत परिचारक म्हणाले.

 त्यांनी अवमानकारक बोललेल्या वाक्याचे समर्थन कुणीही करत नाही आणि करूही नये.

अशा लोकप्रतिनिधींच्या या महानतेचा समाजानं काय आदर्श घ्यायचा ?
 या स्वाभिमानी नेत्याचा मी निषेध व्यक्त करतोय. शेतकऱ्यांचा कळवळा असणाऱ्या पक्षात असलात तरी सैनिकांशी अशा शब्दात बोलणं खूप वाईट आहे.

ही प्रवृत्ती खरीतर काँग्रेसच्या गोटात उत्पन्न झाली आहे आताआता स्वाभिमानाच्या कळपात दाखल झालेले परिचारक यांच्यावर पिढ्यानपिढ्या काँग्रेसच्या विचारसरणीचा पगडा आहे. परिचारक हे थेट भाजपात दाखल नाहीत तर मित्रपक्षात आहेत. आता ते स्वतंत्र आघाडी करून आणि भाजपाच्या बॅनरखाली सभा घेत असल्याने आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत पुरस्कृत केल्यामुळे तशी भारतीय जनता पार्टीही जबाबदार आहेच.

या बेताल नेत्याचा निषेध....

©Vikas Waghamare
Abvp प्रसिद्धी प्रमुख, सोलापूर

(टीका करताना पडद्याची दुसरी बाजू बघायला शिका..! जे झाले ते वाईट आहे, निषेधार्य आहे हे नक्की.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा