सकाळपासून फोटो काढण्याची लगभग सुरु असते. फुटपाथवर जे लोक चिनी, बांग्लादेशी म्हणून आम्ही डिवचून पळून जायचो त्याच पद्धतीचे लोक आज आमच्या भोवताली होते. आसाम, मेघालय, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा यासह ईशान्य भारतातून आलेले हे विद्यार्थी आमच्यासाठी पाहुणे होते. ज्यांना कालपर्यंत डिवचत होतो त्यांनाच आज विचारपूस करण्याची धांदल उडत होती. आज सर्वांनी मिळून नाष्टा केला, मग मात्र जीवाला थोडी जास्तच रुकरुक लागली. सायंकाळी 7 वाजताची परतीची गाडी असल्याचं समजलं. गेली 3-4 दिवस खूप खुप धम्माल केली. ते विद्यार्थी कोण, कुठले, ओळख ना पाळख मात्र आम्ही एकरूप झालो होतो. राष्ट्रीय एकात्मतेच्या गप्पा मारता मारता कधी एकरूप झालो देवजाने ?
संस्कृती, रंग, वेशभूषा, खानपान, परिस्थिती, कॉलेज, अभ्यास, व्यवसाय, इतिहास अशा खूप खूप गप्पा गेल्या 4 दिवसात झाल्या. 4 दिवसाचे पाहुणे कोण जाणे हृदयात घर करून गेले. रेल्वे स्थानकावर निरोपाला निघालो, आठवणींची रांग एव्हाना डोळ्यांच्या कडेवर येऊन ठेपली होती. तीन -चार दिवसाचा काळ आयुष्यात सुवर्णक्षणांची ताजा राहील याची खात्री पटली होती. प्रत्येकाला भेटून, गळा पडून घट्ट मिठी मारली.
भाई, हम एक दिन जरूर आसाम आयेंगे। मी कातर स्वरात बोललो.
बिकासभाई, तुम सब जरूर आये, हम राह देखते हैं। मुझे गर्व हैं इस भारत में हमारे बहुत सारे अपने परिवार हैं । मेरा घर सिर्फ एकही राज्य में नही है। जिस जिस ठिकान पे हम पहुँचे उस ठिकान पर हमें अपना घर मिला हैं। तोसुद्धा भांबावला होता.
मी शांतच बसलो. उत्तर देणं आता मला शक्यच नव्हतं आणि काय बोलणार ?
यतीराज येऊन केव्हा हात धरून पुढे घेऊन गेला समजलं नाही. मी मुकाट चालत राहिलो, पाठीमागे न बघता. रेल्वे डब्यात सर्वांचे साहित्य ठेवलं भराभरा सर्वांचे चेहरे न्याहाळून घेतले. नजर हटत नव्हती. मात्र नाईलाज, माझी माणसं आता दूर त्यांच्या प्रदेशात विखुरली जाणार होती. हि स्थिती माझीच नाही. सोलापूरच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनात हाच भाव दाटल्याचं गडद दिसत होतं.
पुन्हा मी आणि यतीराज होनमाने भराभरा सर्वत्र फिरून भेटी घेतल्या, फोटो काढले, नंबर घेतले, फेसबुक रिक्वेस्ट पाठवण्याचं वचन दिलं आणि आम्ही नक्की नक्की येऊ, तुमचा आणि माझा हा ईशान्य भारत पाहायला, असं म्हणत गाडीतून खाली उतरलो.
"या यात्रेनं सोलापूरला, महाराष्ट्राला काय दिलं माहित नाही. पण मला, माझ्यातल्या माणसाला सुखाची, परिस्थितीची आणि माणूसपणाची याद नक्की दिलीय. ही भारतमाता अखंड आहे मात्र त्यावर ठोकर घालण्याचे काम सुरु असल्याचं अलगद सांगितलं गेलंय. कोण, कुठली परकी माणसं आज मला गदागदा हलवून हेलावून गेली. छे ! परकी कसली ? खरंतर माझ्या भोवतालची माणसंच परकी आहेत. ती तर नातं तयार करून गेली" असं चित्र मनात पिंगा घालत असतानाच गाडीनं वेग घेतला. त्यांचा हात गाडीच्या बाहेर हेलकावे खाऊ लागला. आम्ही मात्र बावरे होऊन पाहत राहिलो हलणाऱ्या हातांकडे......
भाई, हम जरूर आएंगे तुम्हारे प्रदेश में.. जरूर ...। लेकिन याद रखों । बस्स...
✍🏻 विकास विठोबा वाघमारे
📲 8379977650
सोलापुर
#राष्ट्रीय_एकात्मता_यात्रा_सोलापूर #SEIL_TOUR #ABVP
संस्कृती, रंग, वेशभूषा, खानपान, परिस्थिती, कॉलेज, अभ्यास, व्यवसाय, इतिहास अशा खूप खूप गप्पा गेल्या 4 दिवसात झाल्या. 4 दिवसाचे पाहुणे कोण जाणे हृदयात घर करून गेले. रेल्वे स्थानकावर निरोपाला निघालो, आठवणींची रांग एव्हाना डोळ्यांच्या कडेवर येऊन ठेपली होती. तीन -चार दिवसाचा काळ आयुष्यात सुवर्णक्षणांची ताजा राहील याची खात्री पटली होती. प्रत्येकाला भेटून, गळा पडून घट्ट मिठी मारली.
भाई, हम एक दिन जरूर आसाम आयेंगे। मी कातर स्वरात बोललो.
बिकासभाई, तुम सब जरूर आये, हम राह देखते हैं। मुझे गर्व हैं इस भारत में हमारे बहुत सारे अपने परिवार हैं । मेरा घर सिर्फ एकही राज्य में नही है। जिस जिस ठिकान पे हम पहुँचे उस ठिकान पर हमें अपना घर मिला हैं। तोसुद्धा भांबावला होता.
मी शांतच बसलो. उत्तर देणं आता मला शक्यच नव्हतं आणि काय बोलणार ?
यतीराज येऊन केव्हा हात धरून पुढे घेऊन गेला समजलं नाही. मी मुकाट चालत राहिलो, पाठीमागे न बघता. रेल्वे डब्यात सर्वांचे साहित्य ठेवलं भराभरा सर्वांचे चेहरे न्याहाळून घेतले. नजर हटत नव्हती. मात्र नाईलाज, माझी माणसं आता दूर त्यांच्या प्रदेशात विखुरली जाणार होती. हि स्थिती माझीच नाही. सोलापूरच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनात हाच भाव दाटल्याचं गडद दिसत होतं.
पुन्हा मी आणि यतीराज होनमाने भराभरा सर्वत्र फिरून भेटी घेतल्या, फोटो काढले, नंबर घेतले, फेसबुक रिक्वेस्ट पाठवण्याचं वचन दिलं आणि आम्ही नक्की नक्की येऊ, तुमचा आणि माझा हा ईशान्य भारत पाहायला, असं म्हणत गाडीतून खाली उतरलो.
"या यात्रेनं सोलापूरला, महाराष्ट्राला काय दिलं माहित नाही. पण मला, माझ्यातल्या माणसाला सुखाची, परिस्थितीची आणि माणूसपणाची याद नक्की दिलीय. ही भारतमाता अखंड आहे मात्र त्यावर ठोकर घालण्याचे काम सुरु असल्याचं अलगद सांगितलं गेलंय. कोण, कुठली परकी माणसं आज मला गदागदा हलवून हेलावून गेली. छे ! परकी कसली ? खरंतर माझ्या भोवतालची माणसंच परकी आहेत. ती तर नातं तयार करून गेली" असं चित्र मनात पिंगा घालत असतानाच गाडीनं वेग घेतला. त्यांचा हात गाडीच्या बाहेर हेलकावे खाऊ लागला. आम्ही मात्र बावरे होऊन पाहत राहिलो हलणाऱ्या हातांकडे......
भाई, हम जरूर आएंगे तुम्हारे प्रदेश में.. जरूर ...। लेकिन याद रखों । बस्स...
✍🏻 विकास विठोबा वाघमारे
📲 8379977650
सोलापुर
#राष्ट्रीय_एकात्मता_यात्रा_सोलापूर #SEIL_TOUR #ABVP






