शनिवार, १४ जानेवारी, २०१७

अभिषेक अमर असेल

अभिषेक अमर असेल... पण खुनी सुटणार नाहीत!
         
          मंगळवारी अभाविप कर्नाटकच्या अभिषेक नावाच्या कार्यकर्त्यांने आत्महत्या केली. आज खरंतर हा देश एका मोठ्या प्रगतीच्या दिशेने जात असताना कर्नाटक काँग्रेसच्या हरामखोर व सडकछाप NSUI या विद्यार्थी संघटनेने त्याच्यावर दबाव आणला होता. ज्या वेळी देशद्रोही कारवाया करणाऱ्या रोहित वेमुला याने आत्महत्या केली त्यावेळी या देशातील सर्वच ढोंगी राजकीय व हंगामी समाजसेवक मोठ्या पुळक्याने समोर येऊन आवाज करत होते. अभाविपच्या कार्यकर्त्यांना धमकावण्यापासून ते कार्यालये फोडली, मारहाण केली आणि नव्हेनव्हे ते आरोप केले. भावांनो हा देश डोळ्यावर झापड लावून जगत नाही. रोहीत वेमुलाच्या तिरडीवर राजकीय पोळी भाजणाऱ्या आम आदमी पार्टी, काँग्रेस असेल नाहीतर सटर - फटर संघटना असतील यांचे आज भविष्य अंधारमय आहे हे लक्षात घ्यायला हवं. 
       आज अभिषेक सारखा छात्रनेता काँग्रेसच्या NSUI च्या चुकीच्या FIR ला घाबरून हे विश्व सोडून जातो हा काँग्रेसने केलेला खून नव्हे काय? जातीयतेचे विष पेरणाऱ्या राहून गांधींनी अन केजरीवालांनी आता चुप्पी साधली आहे. अरे तुम्ही खुनी आहात हे जगाला माहितीय. अभिषेकने केलेली आत्महत्या देशाच्या समोर आणण्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवणाऱ्या पत्रकारितेला झोप आलीय. विद्यार्थ्यांच्या हितासाठी म्हणणाऱ्या विद्यार्थी संघटना कुठे आहेत? यावर कुणीही बोलायला तयार नाही. कुणी पप्पू हरामखोर आता भेट देणार नाही ना कुणाच्या डोळ्याला धारही लागणार नाही कारण अभिषेक देशाच्या वैभवाचे स्वप्न पहात होता. अरे तुम्ही काहीच करू शकणार नाहीत ज्या दिवशी तुम्ही तुमची नीतिमत्ता सोडली तेव्हापासून तुमची नौका अंधारमय अन किनारा हुकलेल्या दिशेला निघालीय, हे लक्षात घ्या. 
        अभिषेकने कर्नाटकमधील जे. सी. बी. एम. महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने "योद्धा नमन" नावाचा देशप्रेमी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या वक्त्यांबाबत काँग्रेसला विरोध होता. महाविद्यालयाने कार्यक्रमाला परवानगी नाकारली मात्र कर्नाटक काँग्रेसने आपले वजन वापरून अभाविप कार्यकर्त्यांवर खोटा FIR दाखल केला. या केसला घाबरून अभिषेकने मुत्युला कवेत घेतले.आज आमच्या देशभक्त अभिषेकच्या खुनी असणाऱ्यांनो समाजातील किती देशप्रेमी तुम्ही तुमच्या दबावाने संपवणार आहात? अरे या देशात अभाविपचे 33 लाख छात्रनेते देशभक्त आहेत. जर असेल दम तर विचाराने लढा.
पण एक लक्षात ठेवा *इट का जवाब पत्थर से देंगे ।* 

*जोर जुलूम की टक्कर में संघर्ष हमारा नारा हैं।*

                   ✍🏻 *विकास विठोबा वाघमारे*
                  📲 8379977650
                @ सोलापूर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा