निवडणुकांचे रणशिंग फुंकले की लगेचच आघाडीला बिघाडाची बाधा होते तर युतीला वाघोबाची नजर लागते असं ऐकलंय. साधारण मला राजकारण कळत असल्यापासून त्यांची भांडणंसुद्धा कळायला लागली. आज मोठ्या भावाची भूमिका घ्यायला दोन्ही पक्ष अन त्यांचे म्होरके तयार आहेत मात्र ती भूमिका निभावू द्यायला दोघेही एकमेकांना आडवे चालत आहेत.
केंद्र सरकारसह महाराष्ट्रात जसं कमळ फुललं तसं कमळाला खरखर लागली आणि महाराष्ट्रात त्याच खरखरीतून पुन्हा नव्याने अन जोमाने फुल नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने उमललेच. या नगरपालिकांच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये तर मोठा भाऊ कोण ? हे जनतेने सांगितले. मात्र त्याच्या सख्याला समजायला वेळ लागेल. आता मुंबई महानगरपालिका तोंडावर आल्या आणि आश्वासनांची खैरात अन घोषणांची बाशिंगे गुडघ्याला बांधत कोणी महाराष्ट्राचे नेते पुढे आले. महा माहित नाही मात्र जे बोलतो ते करून दाखवतो असे म्हणत आज बेधडक काही बाही बोलत आहेत. मात्र जे करून दाखवले ते का बोलत नाहीत कोण जाणे. मुंबई कुणाची हा प्रश्न मला पडत नाही कारण मुंबई तर कुणाच्या एकाची नाही कारण ही लोकशाही सर्वांना सोबत घेऊन पुढे जाईल मात्र काही बाही बोलण्याच्या अन राजकीय टीकाटिप्पणीच्या नादात "मुंबई पलटी अन महाराष्ट्रातून काही प्रमाणात का होईना पण कुणी फरार होऊ नये याची काळजी घ्यावी." म्हणजे तुमचंही भलं अन आमचंही याचा आनंद होईल...
✍🏻 विकास विठोबा वाघमारे
📲 8379977650
@ सोलापूर


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा