होतात हल्ले इथे
जखम रोज भरते।
तुझ्या राज्यात माझी
रात वैऱ्यावानी सरते।।
वयाच्या 12- 14 वर्षाचा असताना शाळेत सत्यपाल महाराजांचे कीर्तन ऐकण्याचे भाग्य लाभले होते. तेव्हा चळवळ, वळवळ आणि बाहेरचा स"माज" माहिती नव्हता मात्र डोळ्यांची पापणी खाली न करता पूर्ण कीर्तन ऐकलं होतं।
माणूसही वाचला होता तेव्हा। सप्तखंजिरी अन कीर्तन मनात घर करून होतं। अधिमधी आठवण यायची महाराजांची। काही महिने झाले असतील त्यांची पत्नी वारल्याची बातमी वाचली तेव्हाही जरा मनाला जखम झालीच।
आज एक बातमी वाचली अन धक्का बसला। सप्तखंजेरीवादक व कीर्तनकार सत्यपाल महाराज यांच्यावर मुंबईत एका माथेफिरूने चाकूहल्ला केल्याची खळबळजनक घटना.
ही घटना दि. १२ मे रोजी मुंबईतील नायगाव दादर येथे बुद्ध जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम झाल्यानंतर घडली.
शाहू, फुले, आंबेडकर, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांच्या विचारांचा प्रसार करता करता समाजजागृती व प्रबोधन आणि हुंदबंदी वगैरे वगैरे सर्वच विषय कीर्तनातून मांडणाऱ्या एका किर्तनकारावर हल्ला करून काय साध्य होतंय।
पुरोगामी, प्रतिगामी अथवा कसाही असो तुमचा महाराष्ट्र मात्र हे हल्ले पुरोगामी महाराष्ट्रात नाही, प्रतिगामी महाराष्ट्रात नाही तर केवळ महाराष्ट्रात होत आहेत। जग महाराष्ट्राला ओळखत आहे बस्स।
बातमी सुद्धा लवकर नाही समजली। आणखी काय लिहू ?😢😢
जागृती नकोय की जागृती करणारी माणसं हा प्रश्न आ वासून उभा आहे। आणि सोबत महाराष्ट्राची लक्तरे ......😢
आनंदाने मेळवू, आनंदाने खेळवू
आनंदे आनंद साकारू माणसा।
© Vikas Waghamare
📱 8379977650
सोलापूर
जखम रोज भरते।
तुझ्या राज्यात माझी
रात वैऱ्यावानी सरते।।
वयाच्या 12- 14 वर्षाचा असताना शाळेत सत्यपाल महाराजांचे कीर्तन ऐकण्याचे भाग्य लाभले होते. तेव्हा चळवळ, वळवळ आणि बाहेरचा स"माज" माहिती नव्हता मात्र डोळ्यांची पापणी खाली न करता पूर्ण कीर्तन ऐकलं होतं।
माणूसही वाचला होता तेव्हा। सप्तखंजिरी अन कीर्तन मनात घर करून होतं। अधिमधी आठवण यायची महाराजांची। काही महिने झाले असतील त्यांची पत्नी वारल्याची बातमी वाचली तेव्हाही जरा मनाला जखम झालीच।
आज एक बातमी वाचली अन धक्का बसला। सप्तखंजेरीवादक व कीर्तनकार सत्यपाल महाराज यांच्यावर मुंबईत एका माथेफिरूने चाकूहल्ला केल्याची खळबळजनक घटना.
ही घटना दि. १२ मे रोजी मुंबईतील नायगाव दादर येथे बुद्ध जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम झाल्यानंतर घडली.
शाहू, फुले, आंबेडकर, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांच्या विचारांचा प्रसार करता करता समाजजागृती व प्रबोधन आणि हुंदबंदी वगैरे वगैरे सर्वच विषय कीर्तनातून मांडणाऱ्या एका किर्तनकारावर हल्ला करून काय साध्य होतंय।
पुरोगामी, प्रतिगामी अथवा कसाही असो तुमचा महाराष्ट्र मात्र हे हल्ले पुरोगामी महाराष्ट्रात नाही, प्रतिगामी महाराष्ट्रात नाही तर केवळ महाराष्ट्रात होत आहेत। जग महाराष्ट्राला ओळखत आहे बस्स।
बातमी सुद्धा लवकर नाही समजली। आणखी काय लिहू ?😢😢
जागृती नकोय की जागृती करणारी माणसं हा प्रश्न आ वासून उभा आहे। आणि सोबत महाराष्ट्राची लक्तरे ......😢
आनंदाने मेळवू, आनंदाने खेळवू
आनंदे आनंद साकारू माणसा।
© Vikas Waghamare
📱 8379977650
सोलापूर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा