सोमवार, २९ मे, २०१७

राज"नीती हरवत चालल्याचे कारण..

सध्या गोहत्या बंदीवरून बरेच वादळ वाहत आहे. केंद्र सरकारने गोहत्या बंदी कायदा लागू केला. नुकताच केरळ या राज्यात काँग्रेसच्या (निष्ठावंत?) नेत्यांनी विरोध म्हणून गाईंची भर रस्त्यावर हत्या करून बीफ खाऊन विरोध केला. राजकारणात काँग्रेसने आजपर्यंत केवळ सत्ता आणि सत्तेचा उपभोग घेतला आणि आता जनतेने आपल्याला डावलल्याने बेभान झालेला हा पक्ष वाटेल ते करतो आहे. हिंदू धर्मात गाय ही पवित्र मानली जाते. गाईला 33 कोटी देवाच्या रूपाने समस्त हिंदू बांधव पूजतात.

     खरंतर काँग्रेसने केलेला हा प्रताप मला खुप काही धक्का देणारा किंवा वाईट वाटणारा नाहीच. टिळकांच्या मृत्यूनंतर भारतीय राजकारणातले टिळकयूग त्या दिवशी संपले आणि गांधीयुगाला त्याच दिवशी सुरवात झाली. 20 व्या शतकात केवळ भारताच्या नाही तर संपूर्ण जगाच्या राजकारणात मोहनदास करमचंद गांधी याव्यक्तीने मोठा ठसा उमटवलाय. अहिंसा आणि सत्याग्रह ह्या दोन नवीन मंत्रांची ओळख त्यांनी जगाला करुन दिली. टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याला देशव्यापी बनवलं.हा लढा ख-या अर्थाने घरोघरी पोहचवला तो गांधीजींनी. महिला, विद्यार्थी,सवर्ण, दलित उच्च-शिक्षीत, मागास असा समाजातला प्रत्येक वर्गाला त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला जोडले. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चार मुद्यांवर त्यांनी ब्रिटीशसाम्राज्याला हादरवून सोडले. अहिंसा या शब्दाची भलीमोठी देणं आपल्या पूर्वजांनी आपल्या पदरी टाकली आहे हेच आज काँग्रेसच्या लक्षात नाही. गलिच्छ व निच पद्धतीचे राजकारण कशा पद्धतीने केले जाऊ शकते याचे उत्तम उदाहरण जगासमोर मांडण्याचे पाप त्यांनी केले आहे. राजकारणात जय - पराजय आणि बेरीज - वजा हे अटळ असतं. रुपया वर फेकला आहेच तर छाप किंवा काटा एकच पडणार हे निश्चित असतं.

गांधीजींना अभिप्रेत असलेली काँग्रेस आज त्याच गांधी घराण्याने जिवंत ठेवली नाही. राजकारणात मोदींना घेरण्याचे पराकोटीचे प्रयोजन करता करता गायही विरोधक वाटू लागली अर्थात हिंदूही. बीफ खाणं हा ज्याच्या त्याच्या संस्कृतीचा किंवा संस्काराचा भाग आहे असं म्हणूया. केवळ हिंदूंना विरोध करून राजकीय नीती खुंटीला टांगण्याचा प्रयोग करून झाला. ज्या हाताने गोमाता कापली गेली तो "हात" आता कोणत्याही राज्यात निवडून येईल अशी पुसटशीही आशा राहिली नाही.

लोकशाहीत स्वातंत्र्य आहे म्हणून हे कृत्य केलं असेल तर बहाद्दर म्हणायला हरकत नाही मात्र समस्त हिंदू बंधूंच्या भावनांना रस्त्यावर पायदळी तुडवत केलेला हा विरोध म्हणजे काँग्रेसने आत्मघातकी पाऊल टाकलं आहे. आगीतून फुपाट्यात पडणे म्हणजे काय ? हे आता जनतेला उमगलं असेल.
शास्त्राने गोमाता कशी आणि किती प्रकारे उपयोगी आहे हे सिद्ध करून दिले मात्र राजकीय गोळाबेरीज करण्याच्या हेतूने काय साध्य केलं असेल. केरळमध्ये असलेले सरकार हे विकासाच्या आणि परिवर्तनाच्या विरोधात आहे. कम्युनिष्ठ नेत्यांनी आजवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या हजारो कार्यकर्त्यांच्या, पूर्णवेळांच्या व प्रचारकांच्या हत्या केल्या आणि सुरूच आहेत. आता काँग्रेसने त्याच राज्यात खुलेआम गोहत्या केल्या हे नवल नाही मात्र हे नीच पद्धतीचे पाऊल अहिंसावादीचा संदेश जगाला देणाऱ्या पक्षाने उचलले हे गंभीर आहे.

एके काळी गाय आणि वासरू हे चिन्ह घेऊन पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधी यासुद्धा निश्चितच हतबल झाल्या असतील. जर हिंदू धर्माला विरोध करायचा तर मोकळ्या पद्धतीने नक्कीच करा तो अधिकार आहे मात्र अशा विशिष्ठ धर्माला प्रिय असलेल्या प्राण्यांची हत्या करून राजकीय दुकानदारी डागडुजी करण्याचे महापाप म्हणजे स्वतःहून उध्वस्त होणे आहे. लोकशाही मान्य नसलेल्या डाव्यांच्या आणि हिंसावादी काँग्रेसमध्ये काडीचाही फरक नाही आणि आता पक्षाला स्वतःहून संपण्याचे वेध लागले आहेत. विनाकारण टोकाचा राजकीय विरोध करत आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारेपर्यंत द्वेष करतो आहोत हे कधी लक्षात येणार देव जाणे! नाही म्हणायला तर आता त्यांच्या नेत्यांची गणना केली तर मी महात्मा गांधीपासून युवराज राहूल गांधी यांच्यापर्यंतच येऊन थांबतो. (थांबावं लागतं). सत्तेची नशा उतरली असली तरी नौका दिशाहीन होऊन भलत्याच वादळात फसते आहे हे खरं!

✍ विकास विठोबा वाघमारे
📱 8379977650
सोलापूर





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा