शुक्रवार, २८ जुलै, २०१७

कधी संस्कारही महत्वाचा असतो!

धर्मांधता आणि गलिच्छ विचारांनी बरबटलेल्या एका माथेफिरू लोकप्रतिनिधीने (?) केलेलं विधान हे काही धक्का बसणारं किंवा खूप जिव्हारी लावून घेण्यासारखं मला अजिबात वाटत नाही आणि भारतीयाला वाटूही नये। मी वंदे मातरम म्हणणार नाही असं ज्यावेळी मुखातून वदलं जातं त्यावेळी ज्या भुईला माता म्हणतो त्या भुईचे पांग फेडण्याची त्याची लायकी, कुवत नसते असं मी मानतो।

एक आमदार, स"माज"वादी पक्ष, दोन मतदारसंघातून निवडून आलेला वगैरे वगैरे आणि त्यांचा तथाकथित माज। नुकतीच या देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी झाली. त्याच दरम्यान ही जमात असं काही बरळते ते या देशाचं दुर्दैव आहे. या भूमीला स्वातंत्र्य करण्यासाठी गायलेलं वंदे मातरम म्हणायची लाज वाटणं म्हणजे आईला आई म्हणायला लाज वाटण्याच्या पलीकडचे आहे। ज्या देशासाठी हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिलं, भूमातेला वंदन करणारी माणसं आजही आम्ही पाहतो. गायक ए. आर. रहेमान यांनी वंदे मातरम गायलं. या देशाला धर्माच्या भाषेत बोलायच्या म्हंटल तर मुस्लिम देशभक्तांची कमी नाहीय पण भडकावून व्यवस्था गढूळ करू पाहणाऱ्या हरामखोरांचा देश असू शकत नाही हे जाणलं पाहिजे। हाकलून लावण्या इतका वेळही इथे दवडणे चुकीचेच।

भारत हा माझा देश आहे ही प्रतिज्ञा जेव्हा अभिमानाने म्हणतो न तेव्हा हा भारत माझा असतो। अगदीच माझा। आणि तेव्हा मी भारताचा असतो। वंदे मातरम हे माझ्या देशाचं गुणगान असलेलं गीत म्हणजे जनमनाला चेतवणारं रसायन आहे। अबू आझमी, वारीस पठाण सारख्या माथेफिरू आणि तथाकथित लोकांमध्ये जेव्हा अशी मूर्खपणाची लक्षणे दिसतात तेव्हाच त्या बुद्धीची कीव येते। आणि अशी मानसिकता असलेले लोकप्रतिनिधी सभागृहात बसतात तेव्हा राष्ट्र, राज्य समृद्धतेचा कोणता विचार करत असतील हे संशोधनात्मक आहे। जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचा प्रवास ज्याठिकाणी करतो आहोत त्यावर प्रेम न करणारी जमात ही देशाला घातक तर आहेच पण या देशाच्या अंतर्गत सुरक्षेला, व्यवस्थेला आणि विकासाला बाधक आहे, हे नक्की। एका अबू आझमी, वारीस पठाणाने देशाला घंटा फरक पडणार नाही कारण त्याअगोदर हजारो कलाम या देशांत घडवणारी माती आहे ही। पण काळ सोकावू नये म्हणून जागीच ठेचलेलं बरं। सगळेच देशभक्ती आणि देशद्रोह्यांच्या पंगतीला नेण्याची आवश्यकता नाही बरंच काही आचार, विचार अन संस्कारांवर सुद्धा अवलंबून असतं!

© विकास विठोबा वाघमारे
सोलापूर

पटलं तर नक्की शेअर करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा