सोमवार, ३१ जुलै, २०१७

कविता

#वर्षपूर्ती😍😍😘😍😃

दरवेळी असंच होतं ,
मी निघालो कि
पावसाचं आगमन होतं.....
एवढा गुलाबी
पाऊस सोडून मी जाईल का?
भेट नाही
पण आठवण ओली
भर पावसात भाव खाईल का.....
पाऊस मात्र असाच करतो,
तो आला कि
मी मात्र मनात झुरतो....
पावसा तू ये अथवा येऊ नको,
भिजल्या आठवणी ठेऊन
अर्ध्यावर असा जाऊ नको.........

  ✍ Vikas Waghamare  (वाघोलीकर)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा