मंगळवार, १३ जून, २०१७

अभिनंदनीय असं काही...

एकीकडे महाराष्ट्रात शेतकरी संपाने समस्त वातावरण चलबिचल झालं असलं तरीही शेतकरी, कष्टकरी अन अंत्योदय घटकाला सन्मान आणि समृद्धता प्राप्त करून देण्यासाठी सत्तेवर आलो आहोत अशी गर्जना करणाऱ्या भारतीय जनता पार्टी आता अडीच - तीन वर्षांचा उंबरठा ओलांडू पाहत आहे.

"शासन-प्रशासन-समाज" ही त्रिसूत्री जर समांतर चालली तर महाराष्ट्राला पुनरवैभव प्राप्त करून देऊ हे भाजपाने पाहिलेलं स्वप्न निश्चितपणे बऱ्याच प्रमाणात आज सार्थ ठरवताना दिसत आहे। मागेल त्याला शेततळे योजना गेल्या अडीच-तीन वर्षांपूर्वी असल्याची किंवा कुण्या सामान्याला त्याचा लाभ मिळाल्याचे माझ्या ऐकण्यात वा पाहण्यात नाही। आज मात्र तमाम शेतकऱ्यांना गरज असेल तर लाभ देणारच असल्याचे सांगितले जातेय आणि होतंय।

महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती बँकांना सावरण्यासाठी किती वेळ लागेल हे सरकारही नक्कीच सांगू शकणार नाहीत एवढं भोग आजही त्या बँकांच्या माथी आहेत। गावागावातील विविध विकास सोसायट्यांना उजेडात आणून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी त्यांची झाडाझडती घेतली। आता ज्याच्या नावावर सातबारा त्यांना मतदानाचा अधिकारसुद्धा दिला गेला। तुमच्या माझ्या अवती भोवती नक्कीच चांगलं काहीतरी घडतंय।

शिक्षण, आरोग्य, कृषी, कौशल्य, रोजगार आदी अनेक विभागात नक्कीच "न भूतो..." असं कार्य सुरुय...।

व्यवस्था परिवर्तन करत असताना नक्कीच वेळ लागतो हे माहितेय आणि ते परिवर्तन घाईत होऊ नये याचीही काळजी घेतली जावी हेसुद्धा तितकेच महत्वाचे आहे।

गेली दहा-बारा दिवस शेतकरी माय बापाच्या शोषणाविरुध्द राज्यभरात एल्गार झाला त्यामध्ये नाही म्हणायला राजकारण सुद्धा झाले। मात्र शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कर्जमुक्तीच्या लढ्याला सरकारने तत्काळ संवेदनशीलता दाखवून हिताचा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला। आता पावसाचा हंगाम सुरू झालाय। गावशिवारात आता पेरणीला मोठ्या प्रमाणात सुरुवात होईल मात्र सरकारने हाती मिळालेल्या अडीच-तीन वर्षात या माझ्या महाराष्ट्राला किंवा सर्वात पुढे वगैरे म्हणणाऱ्या त्यांच्या महाराष्ट्राला काय दिलं आणि आम्ही काय घेतलं हेसुद्धा अत्यंत महत्वाचं आहे।

पहिल्या पावसात राज्यातल्या अनेक ठिकाणी शिवारा शिवारात भरून वाहणारे ओढे अन आनंदानं धो धो बरसणारे गप्पांचे घोळके नक्कीच पाहायला मिळताहेत। शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस आणायचे असतील तर व्यवस्थेच्या विरोधात मात्र गलबला न करता काही करण्याचं पहिलं पाऊल टाकता यायला हवं। गावशिवार आनंदाने वाहत असताना सोईस्करपणे सरकारला विसरून चालणार नाही। जे चांगलं आहे ते चांगलं म्हणण्याची उत्कट भावना तुमच्या माझ्यात निर्माण झाली पाहिजे। साठ वर्षात ज्या शिवारात देवाच्या कृपेने पडणारे पाणीही वाहू शकत नव्हते त्याच शिवारात तेच पाणी बांधाबांधांमध्ये जिरवले जातेय आणि ओढा रुंदीकरण, खोलीकरण करून गावाला अत्यंत सुबक असा चेहरा देण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे।यालाच खऱ्या अर्थाने जलयुक्त शिवार असं म्हणायचं।

केवळ अंध विरोध करण्यानं भलं कुणाचंच होत नाही डोळ्यांना दिसणाऱ्या आणि मनापासून कार्य करणाऱ्या व्यवस्थेला कधी कधी या हृदयीची त्या हृदयी मनापासून धन्यवाद द्यायला हवा।

@ सोबत अनगर ता. मोहोळ येथील ओढा रुंदीकरण व खोलीकरणामुळे पहिल्या पावसात वाहणारा ओढा। जलयुक्त शिवार यालाच म्हणतात। हे पुनरवैभव नव्हे तर काय म्हणाल.....

अत्याधुनिक ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने श्री. देशमुख यांनी घेतलेले चित्र...

✍ विकास विठोबा वाघमारे
📱 8379977650
सोलापूर




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा