शुक्रवार, २ जून, २०१७

सरकारला किसानपुत्राचे खरमरीत पत्र..

अय सरकार तुम्हाला हात जोडून सांगतो। बापानं संप पुकारला आहे। तो गेल्या 60 वर्षाची गुलमगिरी आणि शोषण थांबवून सन्मान मिळविण्यासाठी।

कोणी जेष्ठ समाजसेवक आणून आम्हाला नेता जन्माला घालायचा नाहीये। आम्हाला आमच्या घामाची किंमत चुकती करण्यासाठी तुम्हाला लक्षात आणून द्यावं लागतं आहे।

मी मोदी द्वेषी, फडणवीस द्वेषी किंवा भाजपा द्वेषी नाही सरकार मात्र मी शेतकरीप्रेमी नक्की आहे। बापाला येडझवा म्हणणाऱ्या खोगिरांच्या विरोधात एल्गार करण्यासाठी चळवळ करतोय। या बांधाच्या त्या बांधाला रातभर विजेच्या एका झलकीसाठी पळणाऱ्या बापाला मला न्याय मिळवून घ्यायचाय।
काँग्रेस राष्ट्रवादीचे षडयंत्र हे माल उधळपट्टी करण्यात असेल। रस्त्यावर बळीराजाला आणण्यात असेल मात्र संप तर जनसामान्यांनी एकत्र येऊन बांधलेली वज्रमुठ आहे हे लक्षात घ्या।

काही दिवसांपूर्वी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली तूर हातात घेऊन भिकाऱ्यासारखा बाप तुमच्या दारात उभा होता आणि तेव्हाच साल्याची पैदास झाली न तिथंच पाणी मुरलं। आणि त्याचवेळी ती मूठ घट्ट आवळली गेलीय।

एकदा शेतकरी बंधूंच्या काळजाला कान लावून बघा सरकार धरणीचा आक्रोश काळजात ऐकू येईल। पोरींच्या लग्नासाठी रानात उगवलेल्या सोन्याच्या जीवावर काढलेलं कर्ज त्याला कासऱ्याची आठवण करून देतं। लाखो कोटींची पॅकेज जर "मेक इन इंडियासाठी देत असाल तर काही कोटींची कृपा मेक इन अनाजसाठीसुद्धा करा। तेव्हा खऱ्या अर्थाने कृषिप्रधान देशात कृषिक्रांतीची मशाल तेवेल.

सरकार शेतकऱ्यांच्या अंगावर धावून जाऊन हा एल्गार दडपण्याचं पाप नका करू। तरीही या यज्ञात आता एका बांधवांचा खून झालेलाच आहे। फुकट मागणाऱ्यातले आम्ही नाही सरकार, घामाची किंमत आणि जगण्याची हिंमत द्या एवढीच माफक अपेक्षा घेऊन रस्त्यावर आलोय।

जर थेट बोलायचं असेल तर या, बांधवांच्या गळ्यात गळा घालून बोला, शेतकऱ्यांच्या बांधावर या । कुण्या दलालाला किंवा मध्यस्थाला घेऊन भावनांचा बाजार नका मांडू। व्यवस्था परिवर्तन हे ध्येय घेऊन आलो आहोत।

आजपर्यंत शेतकरी नेता म्हणून मिरवत तत्कालीन शासनाशी हिजडवाद करणाऱ्या सदभाऊंना पाहून डोळ्यावर विश्वास बसेनासा झालाय। सदाभाऊनं किती लवकर कात टाकली😢😢!

हात जोडून सांगतो एकवेळ भरभरून शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करा आणि सकारात्मक ठोस निर्णय घ्या ।

या संपातसुद्धा राजकारणासाठी दडपडणाऱ्या भ्रष्टवादी दरोडेखोरांनो हा भोळा बाप पुन्हा फसणार नाही। आम्ही सामान्यांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीच्या मार्गाने लढू मात्र तो आवाज सरकार तुमच्यापर्यंत पोहचत नसेल तर आवाज पोहचवण्यासाठी जे जे करावं लागेल ते करण्याची ताकद काळ्या आईनं दिलीय। हे अश्रू भरलं पत्र स्वीकारा सरकार, अजून काय लिहू.... ? 😢😢😢😢

*बंधूंनो, नक्की हे पत्र प्रत्येक किसानपुत्राने पुढे पाठवले पाहिजे ही विनंती*🙏🏻

✍ विकास विठोबा वाघमारे
किसानपुत्र
📱8379977650
सोलापूर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा