शनिवार, २४ जून, २०१७

#माय_बाप_जिंकले!🎊🎊😘
श्रेय घेणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं।

#विस्तृत_माहिती.......💗👇👇

#अभूतपूर्व कर्ज माफी झाली म्हणायला हरकत नाही।
राज्यात रेकॉर्ड ब्रेक म्हणजे 34000 कोटींचे कर्ज माफ करणारे सरकार नक्कीच कौतुकास पात्र आहे। कर्जाच्या ओझ्याखाली माय बापाची मान दबली गेली अन आयुष्याचं जु ओढता ओढता मातीला मिळालेल्या 90 % शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार। काँग्रेसनं 8000 कोटींचे कर्ज माफ केले होते तेही केवळ जिल्हा मध्यवर्ती बँका अन वित्तीय संस्थांची मुनीमगिरी करून घरं भरण्यासाठी. देशातील इतर सर्व राज्यापैकी महाराष्ट्रातील कर्ज माफी सर्वात मोठी कर्ज माफी आहे। राजकारणाला हापापलेल्या बावळ्यांनी मुख्यमंत्र्यांवर किती हीन पातळीवर टीका केली मात्र आज त्यांनी खऱ्या अर्थाने अभ्यास पूर्ण करून विरोधकांना गृहपाठ करण्यास पाठवले म्हणायला हरकत नाही।

💗 आज मंजूर झालेल्या कर्जमाफीचा आढावा-💗
      छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून ही ऐतिहासिक कर्जमाफी केलीय। १.५० लाख रुपयांचे कर्ज सरसकट माफ करणे हेच खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी महत्वाचं पाऊल ठरणार आहे। तत्काळ महाराष्ट्रातील अगदी शेवटच्या शेतकऱ्यांचा आढावा घेऊन व अभ्यास करून आज 89 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची ही सरकारने केलेली उत्तुंग कामगिरी आहे। त्यामध्ये मध्यम मुदतीचे कर्जसुद्धा माफ होणार आहे। यामध्ये 40 लाख शेतकऱ्यांना 1.5 रु च्या OTS योजनेचा लाभ मिळणार आहे। नियमित कर्ज भरणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी 25 हजार अनुदान देणार म्हणजे अच्छे दिन वगैरे म्हणावे लागतील।
      शेतकरी माय बापाच्या आडून मेवा खाण्यासाठी सरसावणाऱ्यांना मात्र चार हात लांब ठेवण्याची योजना आखल्यामुळे "मुळांना थेट पाणी मिळणार" वगैरे म्हणूया।😜😀 त्यामध्ये आयकर भरणारे, आमदार,  खासदार, जि.प. व महानगर पालिका सदस्य, सरकारी कर्मचारी, व्हॅट लागू असलेले व्यापारी यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार नाही।

    घामाचा दाम मिळण्यासाठी आता हमीभाव देण्याच्या दृष्टीने तत्काळ पाऊल उचलावं म्हणजे पडणाऱ्या पाऊसासोबत येणाऱ्या पिकाला अन बापासोबत मातीला दिल गार्डन गार्डन वगैरे वाटायला हवंय। 😍😍💗

© विकास विठोबा वाघमारे
किसानपुत्र
📱8379977650
सोलापूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा