शनिवार, ३ जून, २०१७

संप चिघळला जातोय सरकार

सकाळी पाचला उठून बातम्यांवर नजर टाकली तर दरोडेखोरांवर शिरसंधान करणारे माझे सरकार एका रात्रीत शेतकऱ्यांना बांधून ठेऊ पाहत होतं।

अरे ज्या शेतकऱ्यांना तुम्ही भेटून बोलू शकत नाही त्यांना न्याय देणार का हा सवाल आ वासून उभाय। दलालांना सोबत घेण्यास नकार दिल्यावर झोप उडते आणि मग कोण जयाजी सूर्यवंशी नावाचा तथाकथित नेता तुमच्या कामी येतो। हे दुर्दैव आहे माझ्या बांधवांचं। गडबड घाईत मिटणारा हा संप नाही। हा एल्गार पिढ्यानपिढ्या सोसलेल्या यातनांचा आहे।
या आंदोलनाला नेता नाही चळवळीचा प्रत्येक शेतकरी बाप आज आमच्यासाठी नेता आहे। एका रात्रीत जे काही झालं न त्याने सरकार जनतेचा विश्वास उडतोय।

जेवढं खाली दाबण्याचा प्रयत्न कराल तेवढि या एल्गाराची आग धगधगेल....

भावांनो, संप सुरूच आहे। आपल्याला फसवणाऱ्या शेतकरी नेत्यांना आता न जुमानता लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवा। स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठी क्रांती आपल्याला घडवायची आहे।
© विकास वाघमारे
किसानपुत्र
📱8379977650


#शेतकरी_संप #किसानपुत्र_आंदोलन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा