साधारण दुपार 2 ची वेळ असेल। मी मेसमध्ये जेवण करत होतो। उच्ची पुरा बांधा, इन शर्ट, बेल्ट अन रुबाबदार पेहराव। मात्र बोलण्याची धाटणी बऱ्यापैकी ग्रामीण कम शहरी । कोल्हापूर परिसरातल्या ग्रामीण भागातले मात्र शहरात अधिकारी होते असं समजलं।
दोन शिवाराचं रांगडं अधिकारी वाटावेत असे मात्र शेतकरी होते। शहरात असल्याने लवकर लक्षात येणं तसं कठीण होतं। मात्र जे काही माझ्या कानावर आलं ते विचित्र वगैरेच्या पलीकडं होतं....
पहिला:- कर्जमाफी करून सरकारनं मला ** लावला.
दुसरा:- का? अहो ग्रामीण भागात आहे तशी परिस्थिती, हं, कोल्हापूर वगैरे ठिकाय। पण मराठवाडा, विदर्भ ..? .(प्रश्नार्थक नजरेनं संवाद थांबवला)
पहिला:- भाई, लोकांचा विचार करूनच झालं हे। माझंपण "चार लाख पंचेचाळीस हजार" कर्ज होतं.!
दुसरा :- हं, होईल ना माफ मग...
पहिला :- कसलं माफ । मार्च एंडला बँकेकडून फोनवर फोन यायले, म्हणून शिल्लक होते त्याचं सर्व कर्ज भरलं। अन आता सरकारला सुचलं.. मीच ** घातली नसती तर बरं झालं असतं. 😡
दुसरा :- .......
पहिला :- आता पुढच्या आठवड्यात गावाकडं गेलो की बँकेत जाऊन बघतो आता... काय होतंय.
हरामखोर साले, करायचं तर पहिल्यांदाच करायचं न आता मला काय मिळणार आहेत का परत पैसे..?
_____________________
शुश्शश्श....😢😢😢
आता काय बोलू?
ते ना माझ्या ओळखीचे होते ना गाववाले।
बाप झिजतो न मातीत,
उगाळत राहतो पानापानात,
प्रामाणिकतेची लागण करत तण उपटून टाकत असतो।
वावरभर सैरभैर फिरून झालं की कोणत्या ठिकाणी
कुण्या जातीचं पीक येतं हेसुद्धा भविष्य खरं ठरवतो।
पावसापाण्याची आबाद करण्यासाठी
म्हसोबा, मरीआई, लक्ष्मीआई अन वड्यातल्या ताईबाईला
अनवाणी हेलपाटे घालून उबवत राहतो शेत। तुमच्या माझ्यासाठी पीक।
ऑफिसात बसून शेती करणाऱ्या शतकरी कम साहेबा, कर्ज आनंदासाठी नाही केलं माफ, कुणाचा होतकरू बाप
कुण्या नाला बल्डिंगिवर ताटकळत उभ्या असलेल्या बोरी, बाभळीच्या फांदीला गळ्यात घेऊ नये म्हणून केलंय...!
एकदा पिकलं तर सोन्यावणी शिवार दिसलं न तर पांग फेडलं सरकारनं म्हणंल।
शहर सिटीच्या जातिवंत साहेबांनो, तुम्ही एसीच्या हवेलीतील शेतकरी आहात न। पण धग अजून तुमच्या चंदेरी खुर्चीला नाही पोहचली। एकदा पोहचेल न तेव्हा बघा।😢😢😢
© विकास विठोबा वाघमारे
किसानपुत्र
📱 8379977650
सोलापूर
दोन शिवाराचं रांगडं अधिकारी वाटावेत असे मात्र शेतकरी होते। शहरात असल्याने लवकर लक्षात येणं तसं कठीण होतं। मात्र जे काही माझ्या कानावर आलं ते विचित्र वगैरेच्या पलीकडं होतं....
पहिला:- कर्जमाफी करून सरकारनं मला ** लावला.
दुसरा:- का? अहो ग्रामीण भागात आहे तशी परिस्थिती, हं, कोल्हापूर वगैरे ठिकाय। पण मराठवाडा, विदर्भ ..? .(प्रश्नार्थक नजरेनं संवाद थांबवला)
पहिला:- भाई, लोकांचा विचार करूनच झालं हे। माझंपण "चार लाख पंचेचाळीस हजार" कर्ज होतं.!
दुसरा :- हं, होईल ना माफ मग...
पहिला :- कसलं माफ । मार्च एंडला बँकेकडून फोनवर फोन यायले, म्हणून शिल्लक होते त्याचं सर्व कर्ज भरलं। अन आता सरकारला सुचलं.. मीच ** घातली नसती तर बरं झालं असतं. 😡
दुसरा :- .......
पहिला :- आता पुढच्या आठवड्यात गावाकडं गेलो की बँकेत जाऊन बघतो आता... काय होतंय.
हरामखोर साले, करायचं तर पहिल्यांदाच करायचं न आता मला काय मिळणार आहेत का परत पैसे..?
_____________________
शुश्शश्श....😢😢😢
आता काय बोलू?
ते ना माझ्या ओळखीचे होते ना गाववाले।
बाप झिजतो न मातीत,
उगाळत राहतो पानापानात,
प्रामाणिकतेची लागण करत तण उपटून टाकत असतो।
वावरभर सैरभैर फिरून झालं की कोणत्या ठिकाणी
कुण्या जातीचं पीक येतं हेसुद्धा भविष्य खरं ठरवतो।
पावसापाण्याची आबाद करण्यासाठी
म्हसोबा, मरीआई, लक्ष्मीआई अन वड्यातल्या ताईबाईला
अनवाणी हेलपाटे घालून उबवत राहतो शेत। तुमच्या माझ्यासाठी पीक।
ऑफिसात बसून शेती करणाऱ्या शतकरी कम साहेबा, कर्ज आनंदासाठी नाही केलं माफ, कुणाचा होतकरू बाप
कुण्या नाला बल्डिंगिवर ताटकळत उभ्या असलेल्या बोरी, बाभळीच्या फांदीला गळ्यात घेऊ नये म्हणून केलंय...!
एकदा पिकलं तर सोन्यावणी शिवार दिसलं न तर पांग फेडलं सरकारनं म्हणंल।
शहर सिटीच्या जातिवंत साहेबांनो, तुम्ही एसीच्या हवेलीतील शेतकरी आहात न। पण धग अजून तुमच्या चंदेरी खुर्चीला नाही पोहचली। एकदा पोहचेल न तेव्हा बघा।😢😢😢
© विकास विठोबा वाघमारे
किसानपुत्र
📱 8379977650
सोलापूर


मस्त
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
उत्तर द्याहटवा