रविवार, ३ डिसेंबर, २०१७

"हार्दिक" किंगमेकर ठरेल?

"हार्दिक पटेल" गुजरातच्या विधानसभा रणधुमाळीत अत्यंत तगडेपणानं लढताना पाहायला मिळतोय. खरंतर शहरात काय विकास झाला आणि खेड्यात काय झाला यावर विशेष प्रश्न अन जहाल टीका करताना हार्दिक पहायला मिळतोय. भारतीय जनता पार्टी गेली 22 वर्ष सत्तेत असल्याचं दिसून येतं आणि त्यात महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुद्द पूर्वी कारभार सांभाळला आहे. मात्र हार्दीकचा या जोशपूर्ण सभा, रोड शो, टीका आणि त्याला मिळणारा जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद हे सगळं विलक्षण आहे. नवखा 23-24 वर्षाचा हुल्लड पोरगा इतकं सगळं तळमळीनं मांडतोय, बोलतोय हे गुजरातला आणि पर्यायाने बहुतांश जनतेला आपलंसं वाटत असावं. पाटीदार समाजाला आरक्षण मिळावं यासाठी नेतृत्व करत असलेला हार्दिक आता राजकारणात चांगलाच रुळलाय. थेट ग्रामीण भागात जाऊन शेती, पाणी, पीक, आरोग्य, रोजगार, युवक अशा जनतेच्या जिव्हाळ्याचा विषयांवर सरकारवर हल्लाबोल करतोय. मोदी आणि समस्त टीम गुजरातच्या निवडणुकीत उतरली असली तरीही हार्दिक त्या मॉडेल समजणाऱ्या गुजरातचा युवा किंगमेकर ठरतो का अशी भीतीही आहे. दोन सहकारी थेट काँग्रेसमध्ये गेले. अल्पेश ठाकूर आणि जिग्नेश मेवाणी. मात्र हार्दिक पटेल मात्र भाजपाला हरवण्यासाठी एकटाच लढतो आहे. काँग्रेसला मुका पाठिंबा मात्र दिला आहे. प्रस्थापित व्यवस्था उलथून टाकणार म्हणजे टाकणार, मोदींना हरवून दाखवणार, दम लावून हरवणार, बदला घेणार अशा वाक्यांमधून सरकारबद्दलची चीड असलेली जखम भळभळताना दिसतेय. मुख्यमंत्री असलेल्या जिल्ह्यातसुद्धा जाऊन थेट लाखोंची सभा घेऊन सत्ताधाऱ्यांवर तोफ डागलीय. कालच सुरतला जाहीर सभा घेतली आणि प्रचंड गर्दीचा आगडोंब काय असतो हे पाहिलं.
             
      खेळण्या बागडण्याच्या वयात प्रस्थापित गलथान व्यवस्थेला तगडं आव्हान देणारा हार्दिक मला पूर्वीपासूनच आवडतोय. आंदोलन कोणतंही असो, त्याची पद्धत कोणतीही असो आणि ते कुणीही चालवलेले असो जर सामान्यांच्या जिंदगीचे असेल तर त्याला पाठिंबा दिला पाहिजे असं प्रामाणिकपणे वाटतं. उद्या निवडणुका संपतील. भाजपा बहुमताने येईल का हार्दिककडे कौल जाईल हे येणारा काळ ठरवेल मात्र गुजरातमध्ये हार्दिक लढवत असलेली खिंड जबराट आहे. राहुल गांधींच्या आयुष्यात अशी चळवळ केली नसेल तेवढी धावपळ आणि धगधग हार्दिक करतोय. हार्दिक राहुल गांधीपेक्षा उजवा ठरलाय. भाजपाच्या सर्वच नेत्यांना विकासाच्या मुद्द्यावर तो नडु पाहतोय आणि तेही अगदी बेधडकपणे हे विशेष वाटतंय. हार्दिक भाई अलग रसायन हैं, ये पसंद करना पडेगा।। सर्वांना शुभेच्छा!!!

© विकास विठोबा वाघमारे
📲 8379977650
वाघोली, ता - मोहोळ, जि. - सोलापूर




(सुरत रोड शो)

गुरुवार, १९ ऑक्टोबर, २०१७

लालपरी संपाच्या निमित्ताने....

प्रामुख्याने खेड्यापाड्यातून शेरसिटीला धावणाऱ्या माणसांना घेऊन तमाम महाराष्ट्रभर धावणाऱ्या लालपरीने संप केलाय। आंदोलन कोणतेही असुद्या किंवा त्याचे नेतृत्व कुणीही करू द्या। जर सामान्यांच्या हितासाठी अन कल्याणासाठी असेल तर बिनशर्त आपण त्याचे समर्थन करायला हवंय। सरकार लालपरी तोट्यात आज म्हणून 7 वा वेतन आयोग लागू करत नाही। गळके डबे घेऊन भिकार व्यवस्थेला दोष न देता बिनदिक्कत अन जिवाच्या आकांताने कर्मचारी लाखो प्रवाशांना वाहून सुखरूप पोहोचवतात। सरकार भाजपाचे आहे म्हणून हे आंदोलन चुकीचे आहे म्हणणाऱ्यातला मी तर नाही। 8/9 हजारांची तोडकी रक्कम कुण्या सरकारी कर्मचाऱ्याला आहे? जोखमीचे काम करून कोणतीही सक्षम व्यवस्था प्रशासन देऊ शकत नाही आणि पुरेसा पगारही देऊ शकत नाही यापेक्षा दुसरं काय दुर्दैव असणार..?


आज सणासुदीच्या दिवशी संप केला त्यातुन प्रवाशांचे हाल झाले म्हणून डांगोरा पिटताना खाली मान घालून व्यवस्थेला चकार शब्दही न बोलणाऱ्यांना न्याय मिळतच नाही हे जाणलं पाहिजे।

सदर खात्याचे मंत्री शिवसेनेचे आहेत म्हणून अडचणीत आणण्याचा डाव अजिबात नाही। मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यायला हवाय। हे असेच सुरू राहिले तर कर्मचाऱ्यांना जनता ठोकून काढेल हे महसूलमंत्री श्री. चंद्रकांत दादांनी सांगितलं म्हणे । एखाद्या आंदोलनाला अशा पद्धतीने उत्तर द्यावे हे राज्यकर्ते म्हणून अजिबात योग्य नाही। सरकारला अडचणीत आणण्यासाठी जर हे आंदोलन असेल तर सत्य वेगळे आहे की वास्तव हे सरकारने समोर आणायला किंवा त्यामध्ये सरकारची भूमिका बजावणाऱ्या विचारवंतांची समोर आणायला हरकत नाही।

एस. टी. कात टाकतेय म्हणत आम्ही वाय-फाय सुविधेचे स्वागत केले असे बदल होत असतील तर स्वागहार्य आहे। एकीकडे लालपरी गाळात आहे म्हणून पगारवाढ होत नाही, सुविधा मिळत नाहीत म्हणताना गेली कित्येक वर्षे हे सुधारण्यास तत्सम व्यवस्था पुढाकार का घेताना दिसून येत नाही हेही समोर आलं पाहिजे। कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यावर काढून टाकले जाईल असा धमकी वजा हुकूम जर कुणी काढणार असेल तर पाय खोलात पडतोय हे लक्षात घ्यायला हवंय।

आंदोलन कुणी केलं हे महत्त्वाचं नाही। ज्या गोष्टीसाठी केलं हेच या क्षणाला महत्वाचं आहे। आज-उद्या पुन्हा लालपरी रस्त्यावर येईल आणि सरकार मोठ्या जोमाने एसटी सक्षम करण्यासाठी सरसावेल ही अपेक्षा।

© विकास विठोबा वाघमारे
📲 8379977650

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

कम्युनिष्ठ विचारधारा अन हत्या...



विचारधारा कोणतीही असुद्या त्याची हत्या करणे गैरच आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली ही रक्तरंजित कहाणी डाव्या विचारसरणीचे पुरस्कर्ते / कार्यकर्ते नवी आणि चुकीची असल्याचा केवळ वरवर आव आणत आहेत. गौरी लंकेश यांची हत्या दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या ओळीत बसवताना डाव्या विचारसरणीचे सरकार ज्या राज्यात गेली पस्तीस वर्षे राज्य करत होतं त्या पश्चिम बंगालसारख्या राज्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परीवारातील शेकडो कार्यकर्ते, प्रचारकांच्या हत्या भरदिवसा झाल्या आणि सुरूच आहेत त्यांनाही याच ओळीत का बसवत नाहीत?
कुणाचीही हत्या झाली कि थेट संघ आणि परिवारातील संघटनांना आरोपी करून मोकळे होताना रक्तरंजित इतिहास कुणाचा आहे हे तपासले पाहिजे. १७९३ साली jaks माले या फ्रेंच पत्रकाराने जाहीर सांगितले कि क्रांती स्वतःची पिले खाते. त्याचा परिणाम आज हळूहळू जगासमोर येताना दिसतोय हे सत्य नाकारून चालणार नाही. 
एकीकडे व्यवस्था उध्वस्थ करून रक्त पाहणाऱ्या कम्युनिष्टांनी सामाजिक समतेच्या गोंडस नावाखाली "जय भीम - लाल सलाम" अशी थोतांड घोषणा अस्तित्वात आणून समाजातील दलितांना आकर्षित करण्याचा तोकडा प्रयत्न केला. या लाल सलाम अन जय भीमचा एकमेकांशी काडीमात्र हि संबंध नाही. एकीकडे डॉ. बाबासाहेबांना आदर्श मानणारे आम्ही दलित त्यांचे विचार समजून घेत नाही. मरण्याच्या ३ महिने अगोदर काठमांडूमध्ये बाबासाहेब म्हणाले होते कि "जोपर्यंत माझे अन बुद्धांचे विचार या देशात आहेत तोपर्यंत या कम्युनिष्टाना थारा देऊ नका. ठेचून काढा."  मग आम्ही कोणत्या विचाराने लाल सलामला भिक घालतोय..? याचे नवल वाटते. वाघासोबत कितीही कुटुंबासारखे राहायचे ठरवले तरी भूक लागली कि तो आपल्याला फाडून खाणार हे नक्की. कारण त्याचा तो धर्म आहे. तसाच या आमच्या दलित बांधवांचे झाले. जय भीम-लाल सलाम म्हणत कम्युनिष्ट छताखाली काही गेले खरे पण १४ एप्रिल २०१६ रोजी  गडचिरोलीच्या छल्लेवाडा इथे डॉ. बाबासाहेबांच्या जयंती सोहळ्यावर त्यांचीच ढालकरून दलित बांधवावर नक्षलवाद्यांनी अंधाधुंध गोळीबार केला. एकीकडे कम्युनिष्ट नेते जय भीम-लाल सलाम म्हणतात अन दुसरीकडे तशाच कार्यक्रमात त्यांचीच पिल्ले म्हणजे "लाल सलाम हा जय भिमवर हल्ला करतो". हे कधी लक्षात घेणार. 

कम्युनिष्ट चळवळीत माओवादी आणि लेनिनवादी अशा दोन संघटना काम करतात. आता कम्युनिष्टांची माओवादी विचारधारा समाजातून हाकलून लावली जातेय याची भीती त्यांना आहेच आणि त्यातून मग क्रांती आपलीच पिले खाते याप्रमाणे एक एक विचारवंत (?) गिळंकृत करत नाही हे कशावरून...
 आपल्याच कळपातील एखाद्या व्यक्तीला खायचं अन मग त्याचा भावनिक वापर करून आपली विचारधारा वाढवायची ही डाव्यांची पद्धत आहे. कालपर्यंत माहित नसलेल्या एका महिलेची हत्या होते आणि समाजमन हळहळत, मेणबत्या, शोकसभा अन राज्य सरकार सोडून थेट केंद्र सरकारवर दबाव, टीका सुरु होते. हळूहळू कार्यकर्ते द्वेषाने पछाडून उठतात चौकात येतात आणि मग त्या तथाकथित लेखकाने लिहिलेली पुस्तकं खपतात त्यातून विचारधारा समाजात जाते अशापद्धतीने हे अत्यंत्य जहरी विष याच लाल सलाम म्हणणाऱ्या कम्युनिष्टांनी पेरलं, आणि पेरण्याची प्रक्रिया सुरु आहे. एकीकडे कर्नाटक सरकार आपल्या पद्धतीने तपास करत आहे मात्र देशभरातील बोटावर मोजण्या इतके असलेल्या कम्युनिष्टांनी लगेच हिंदुत्ववादी संघटनांना आरोपी करून आपली अर्धवट बौद्धिक अक्कल पाजळली.      

आता पश्चिम बंगालचा बालेकिल्ला गमावून बसले आहेत. केरळमधील सत्ताही त्यांच्या हातातून निसटली आहे. सोळाव्या लोकसभेमध्ये त्यांची संख्या हातावर मोजण्या इतकीही नाही. आज समस्त डावे पक्ष राष्ट्रीय राजकीय प्रवाहातून बाजूला पडलेले दिसतात. आणि याच निराशेतून समाजात स्थान निर्माण करायचं असेल, सहानुभूती मिळवायची असेल तर सशस्त्र क्रांतीमध्ये सामील असलेल्या एका चेहऱ्याला जावं लागेल हि प्रवृत्ती या सर्व हत्यांमागे असू शकते. जर माणूस म्हणून समाजात हळहळ होत असेल तर दाभोकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश आणि  केरळ, पश्चिम बंगाल या भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील शेकडो कार्यकर्त्यांच्या कम्युनिष्टांनी केलेल्या हत्या विसरून चालणार नाही.
गौरी लंकेश या केवळ डाव्या विचारांच्या पत्रकार नव्हत्या तर त्या सक्रिय सशस्त्र माओवाद्याला समर्थन देणाऱ्या महिला होत्या हे विसरून चालणार नाही. नक्षलवादी हिंसेला उघड समर्थन देणाऱ्या, जेएनयूच्या गद्दारांना मुलं मानणाऱ्या, कारावासाची शिक्षा झालेल्या पण जामिनावर बाहेर असलेल्या गौरी लंकेश यांचा अंत्यसंस्कार पूर्ण सरकारी इतमामात करून कॉंग्रेसने आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केलाय. गौरी लंकेश यांना नक्षवाद्यांकडून धमक्या येत होत्या हे विधान नुकतंच त्यांच्या भावाने केलं. त्यांच्या हत्येपूर्वी काही वेळ सोशल नेटवर्किंगच्या पोस्ट पाहिल्या तर माओवाद्यांकडे याची दिशा वळते आहे. ते तपासात निष्पन्न होईलच. मात्र समाजात जहरी विष पेरण्याची वृत्ती कशा पद्धतीने पाय रोवताना दिसते आहे हे दिसते आहे. 

विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
८३७९९७७६५०



शनिवार, १९ ऑगस्ट, २०१७

वाल्मिकी होण्याच्या निमित्ताने...

जन्म एका परिवारात सांभाळ दुसऱ्याच परिवारात आणि थकलेल्या जिवाने आता तिसऱ्या परिवारात आडोसा घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. कार्यकर्ता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेल्या नेत्याला राजकीय ग्रहण लागलेले पाहायला मिळणे हि दुर्दैवाची गोष्ट आहे. कोकणपट्ट्यातलं परवलीचं नाव म्हणून सुरवातीच्या काळात पुढं आलं नंतर जातीच्या आधारे थेट मुख्यमंत्रीच. नारायण राणे हे शिवसेनेतुन राजकीय नेते म्हणून जन्माला आले. युती सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री म्हणून कार्यरत होते. १ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर जुलै २००५ पर्यंत शिवसेनेत राहिले आणि नंतर मात्र काँग्रेसच्या आडोश्याला जाण्याचं पाप केलं. पुढं दोन्ही मुलांना आपल्या हाताला धरून राजकारणात आणून सोडलं. आता निलेश राणे व नितेश राणे हेदेखील तोलामोलाच्या राजकारणात आहेत. महाराष्ट्रातील वजनदार नेत्यांमध्ये घेतले जाणाऱ्या नावाचे कालांतराने हसे झाले.  कोकणातील सर्वांत जास्त जनपाठिंबा असलेले नेते, आक्रमक भाषाशैली, आणि महाराष्ट्रातील ताकदीचे नेते म्हणून असलेली त्यांची ओळख आता कित्येक पावसाळे सोसून झडलेल्या छत्रीप्रमाणे झालीय. आठवण म्हणून माचोळीला सांभाळत ठेवायची कि रहदारीच्या खोलीत शोकेसमध्ये एवढाच प्रश्नय आता.


शिवसेनेतून बाहेर पडलेल्या या नेत्याने काँग्रेसवर तरी कुठे मनापासून प्रेम केलं होतं! अवघ्या दोन वर्षात म्हणजे दोन हजार आठ साली पक्षविरोधी कारवाया केल्याचा डाग माथी बसलाय. नंतर प्रहारासारखे वृत्तपत्र चालवलं. तेवढ्यावरच थांबले नाहीत तर पुन्हा दोन हजार नऊला काँग्रेसच्या विरोधात जाहीर विधाने केल्याने निलंबनाची शाब्बासकी घेतली. माफी, दिलगिरी करून मग कारवाई मागे घेण्यात आल्याचा इतिहास तर साक्ष देतोय. त्यानंतर मात्र पुन्हा जाऊ तिथे खाऊ याप्रमाणे महसूलमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली.

एवढं सगळ असताना गेल्या तीन- चार वर्षात त्यांना मोठ्या राजकीय ग्रहणाला तोंड द्यावं लागतंय. मोदी लाटेने हिंदकळलेल्या पक्षांसोबत रसातळाला गेलेले राजकीय भवितव्य घेऊन तीन चार वेळा प्रायचीत्य भोगावं लागलं. हे पाप केवळ त्यांनी केलेल्या राजकारणाचं आहे. आता भाजपामय प्रवास सुखकर व्हावा यासाठी भूकंप करण्याच्या बेतात असल्याचं ऐकायला मिळतंय. वाल्याचा वाल्मिकी करण्याचा प्रयत्न भाजपा करेलही मात्र त्या वाल्मिकीने नव्याने वादळाशी दोस्ती करताना आपले भवितव्य उज्वल आणि शाबित होणार नाही याची काळजी घ्यावी. भाजपा अंत्योदय घटकाचा विकास म्हणून सर्वाना सामावून घेईलही मात्र इतिहास सांगतोय कि या नेत्याने आपले बुड इथे कायमस्वरूपी टेकवले का हे कसे कळणार....  मात्र कणकवलीपासून, कोकणमार्गे महाराष्ट्रात राणे वाल्मिकी होण्याने काही भूकंप वगैरे अजिबात होणार नाही. बाकी आओ साथ चले.. मंजिल तक जाना है... आणि सबका साथ वगैरे वगैरे सगळं ठिकाय. खूप शुभेच्छा.

©विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱8379977650

तपशील साभार- गुगल

गुरुवार, १७ ऑगस्ट, २०१७

एक्कावन्न हजाराच्या निमित्ताने....

थाकथिक लोकहो, विमानाचा प्रवास खर्चिक आहे म्हणून मी बसतही नाही आणि कधी बोंबलतही नाही. कॅनेडीयन पॉप स्टार जस्टिन बिबर हा कलाकार नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये १० मे रोजी येऊन गेला. गायला कि नाही माहित नाही.  एकूण ४५ हजार दर्शक या कार्यक्रमाला उपस्थित असा अंदाजही वर्तवला गेला. स्टेडियमच्या  दीड  किलोमीटर परिसरात व्यवस्था केली होती. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 76 हजार रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत तिकिटांची किंमत होती. बिनदिक्कत तिकिटे हातोहात संपलीसुद्धा. कॅनेडीयन पॉपस्टारला कोट्यावधींची माया गुपचूप काही तासात दिलीत अन आता गावभर बोंबलता ते पोलीस कल्याण निधी कार्यक्रमासाठी. 


दुखणं ते नाहीच आहे. तुमचं दुखणं ते आहे कि एका मुख्यमंत्र्यांची बायको हे कसं करू शकते! केवळ (जस्टीन बिबरच्या मानाने) ५१ हजाराचे तिकीट आहे म्हणून गावभर गलगा करताय. पोलीस कल्याण निधीसाठी कार्यक्रम होतोय. ज्यांना परवडते ते जातीलच. पळवाटा काढणाऱ्या हरामखोरांची या देशात कमी नाही. नवे नवे मुद्दे काढायचे अन लोकांना चकवून सोडायचं एवढेच उद्योग. मध्येच कुणीतरी एक आवई उठवली अमृता फडणवीस नक्षलवाद्यांसाठी कार्यक्रम करते! काय गंमत आहे दळभद्री विचारधारेची. मुख्यमंत्र्यांची बायको नक्षलवाद्यासाठी कार्यक्रम करते अन तिचा नवरा देश, राज्य विकासाच्या सर्वोच्च स्थानी घेऊन जाण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतोय. काय काय बोलाल याचा थांगपत्ताच लागत नाही. ज्या राज्यात जस्टीन बिबर चालतो त्या राज्यात एक मराठमोळी गायिका का चालत नाही तर ती गायिका एका मुख्यमंत्र्यांची पत्नी आहे, ती उजव्या विचारधारेतील आहे, ती राज्य सुजलाम सुफलाम करू पाहणाऱ्याची बायको आहे, ती एका विशिष्ठ समाजातील आहे म्हणून.

कलाकार हा कलाकार असतो. जात, धर्म, पंथ आणि व्यक्ती याच्या पलीकडे जाऊन कलाकाराला सन्मान देण्याची काय अपेक्षा करणार. तोडू का फोडू करण्यासाठी टपलेल्या दुर्जन शक्तींनो, हा महाराष्ट्र सर्वांच्या साथीने पुढे जातोय. सकारात्मकता ही महत्त्वाची ठरणार आहे. आओ साथ चले.....

©विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱8379977650

गुरुवार, १० ऑगस्ट, २०१७

समाजातलं हे वास्तव...

इडा पीडा टळू दे,
बळीचे राज्य येऊ दे...
असा आर्जव करणाऱ्या सह्याद्रीच्या कुशीतल्या महाराष्ट्रा तुझ्या पोटी जन्माला आलेल्या माझ्या उपवर होत असलेल्या भगिणीला शेतकऱ्यांच्या दळभद्री जगण्याच्या यातना छळताहेत। काकाने आत्महत्या केली उद्या बाप मरेल म्हणून लग्नाला आलेली एक बहीण हकनाक गेली। कोणत्या परिवर्तनाची वाट पाहतोय आपण। अरे ज्या बापानं शेतीसाठी अख्खा जलम मातीत पुरला, फाटका धोतराचा सोगा अन एक काळवंडलेली बंडी घालून काळ्या भुईत समरस झाला। कधी पावसानं जाच केला तर कधी सरकारनं, कधी माणसांनी काळजाला वार केला तर कधी आपल्याच कर्मानं। किती बळी गेले? कुणासाठी गेले? कशासाठी गेले? आणि का गेले? याचे उत्तर देण्याची लाज वाटते। शेतकरी कर्जमाफीने माझ्या बापाला स्वातंत्र्य मिळणार नाही माझ्या बापाला जगणं आनंदी करायचं असेल तर सरकार बापाच्या मातीला माय मानाला शिका। कर्जमाफी ही मलमपट्टी आहे ऑपरेशन तर हमीभाव आहे। प्रश्न इथे नाही संपत इथे तर सुरुवात होते।
मोर्चे, आंदोलन, निषेध कुणासाठी काढू? बापाच्या सन्मानासाठी? जगणं मंजूर करण्यासाठी? माझ्या मातीच्या लेकरांच्या हमीभावासाठी? गेलेल्या बहिणीला न्याय देण्यासाठी? तमाम बळीराजाला दोरीतून मुक्त करा यासाठी?

कित्ती भयाण वास्तवय, नेटवर्किंग स्पीड अन जगण्याची नवी नवी पायवाट समोर येत असताना मातीत जाणाऱ्या पिढ्या कुणाकडे करणार आर्जव? ज्या बहिणीने कर्ज काढायला लागू नये म्हणून सगळंच संपवून टाकलं न तिला विचारा न बापाला काय यातना होत्या। जगणं रस्त्यावर नाही भावांनो। इतकं उदार, निराश सहज नसतं होता येत। ज्याच्या घराला आग लागते न त्याला कळतं घर बांधायला काय यातना झाल्या होत्या। अरे अवघ्या बारावीत शिकणाऱ्या एका बहिणीने बापासाठी जगणं उधळून दिलं। परभणी जिल्ह्यातल्या जवळाझुटातल्या कर्जबाजारी व नापिकीमुळे वडिलांच्या आत्महत्येच्या भितीने सारिका झुटे या भगिणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या आता मला धक्कादायक नाही वाटत पण त्यासाठी केली न ते काळीज कापत जाणारं वास्तवय।

उन्हातानात कष्ट करून पैसा पैसा जमवला अन मग मातीची ओटी भरली मात्र पावसाला अजून ओल वाटेना। वावरात पीक जळत असताना मनात बाप जळतो। ते जळण कुणाच्या नावानं नाही सरकार, तुमच्या तर अजिबात नाही पण जगण्याच्या तळमळीला आर्जव करताना मनात जळताना बाप हाय लागून कधी जातो हे कुणालाच समजत नाही। कालपरवापर्यंत बापाची हाय लेकापर्यंत आली होती आता लेकीपर्यंत आलीय।

हे भयाण सगळं वास्तव कळतं एसीपासून थेट सगळ्याच साहेबाला पण वळत नाही, हाच मुद्दाय।

©विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱8379977650


मंगळवार, १ ऑगस्ट, २०१७

नेता, आरोप आणि सत्य!

चळवळीच्या वळचणीला राहून समाजातील तत्सम घटकांसाठी काम करणाऱ्या अनेक व्यक्तिमत्वांना महाराष्ट्र ओळखतो। कुणी कोणत्या चळवळीत काम करावं हा व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग समजू आणि असतोही। कुणी शेतकरी चळवळीत काम करून शेतभाताच्या पखाली वाहणाऱ्या माय बापाला सन्मान देण्यासाठी एल्गार केला तर कुणी दिन दलित चळवळीला व्यापक रूप देऊन गावकुसाबाहेरच्या जगण्याला समाजासमोर आणण्याचा कसोशीने प्रयत्न केला। भटक्या, कष्टकरी जनतेच्या हक्कासोबत लढताना कधी राजकीय वळचणीला आले हे त्यांनाही समजले नसेल (?) मात्र गेल्या काही वर्षांमध्ये घडत असलेलं हे वास्तव म्हणा की दुर्दैव मात्र कुठेतरी पाणी मुरतंय हे नक्की।
नुकताच महाराष्ट्राचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांवर बलात्काराचा आरोप केला गेलाय। नेमकं खरं किती आणि खोटं किती हे आजच्या घडीला सांगणं अतिघाई होईल। गेल्या दोन तीन वर्षांपूर्वी दलित चळवळीतील नेतृत्व करत असलेल्या लक्ष्मण माने यांच्यावर तसाच आरोप झाला त्याचं पुढं काय हे मलातरी अजून कळलेलं नाही। त्यानंतर दलित आणि डाव्या विचारसरणीचे नेते , महाराष्ट्राचे आघाडी सरकारचे स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्यावर असाच आरोप झाला। त्याचं पुढं काय हेही समजलं नाही। नुकताच मागच्या आठवड्यात लोकमान्य टिळकांच्या पिढीतील रोहित टिळक यांच्यावर तसाच आरोप झाला। महिलांवर अत्याचार नेमका झाला किंवा नाही हे सांगता येणार नाही। त्याची चौकशी तर झालीच पाहिजे मात्र या सर्व प्रकरणात पाणी मुरतंय हे लक्षात घेतलं पाहिजे।

चळवळीतून वर येणारा सामान्य कार्यकर्ता जेव्हा नेता होतो तेव्हा असे नक्कीच वेगवेगळे आरोप केले जातात मात्र अशी चिखलफेक होत असेल तर चळवळीतून उभा होत असलेलं गेल्या अनेक वर्षाचा नेता आणि चळवळीचा चेहरा गमवावा लागू नये। ज्यांनी अशा गोष्टी केल्या त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे किंबहुना सामान्यांपेक्षा जास्त कारवाई झाली पाहिजे मात्र जनतेच्या समोर सत्य आले पाहिजे।

कुटील डाव रचून एखाद्या नेतृत्वाची बदनामी करण्याचा जर प्रयत्न असेल तर राजकारण एका मोठ्या वाईट वळणावर आहे। धुतल्या तांदळाचे कुणी असतील का माहीत नाही मात्र या सर्व प्रकरणात न्यायव्यवस्थेने चोख काम करून सामान्य जनतेला सत्य सांगावं।

नाहीतर मग ढोबळे, टिळक, माने यांच्यानंतर सदाभाऊ खोत आणि मग पुन्हा नवा चेहरा याच रेषेत येईल...... एखाद्या दीडदमडीच्या षडयंत्रात कित्येक वर्षाची चळवळ मोडून पडू नये। बस्स, एकच अपेक्षा।

© विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱8379977650
#विवा

सोमवार, ३१ जुलै, २०१७

कविता

#वर्षपूर्ती😍😍😘😍😃

दरवेळी असंच होतं ,
मी निघालो कि
पावसाचं आगमन होतं.....
एवढा गुलाबी
पाऊस सोडून मी जाईल का?
भेट नाही
पण आठवण ओली
भर पावसात भाव खाईल का.....
पाऊस मात्र असाच करतो,
तो आला कि
मी मात्र मनात झुरतो....
पावसा तू ये अथवा येऊ नको,
भिजल्या आठवणी ठेऊन
अर्ध्यावर असा जाऊ नको.........

  ✍ Vikas Waghamare  (वाघोलीकर)

कविता

#माऊली🎊😘💝

रानी घाट्यांचा नाद, माऊली पांडुरंग झाला।
तिफन हाके डौलात, माऊली रानी दंग झाला।।

किती व्याकुळ भेटी, नाम पंढरी सदा स्मरतो।
टाळ चिपळ्या नाचवत, माऊली वादंग झाला।।

उधळत उसळत, होऊनी बेभान वारकरी।
अंश होण्यास पंढरीचा, माऊली रंग झाला।।

✍ Vikas Waghamare
सोलापूर
8379977650

कविता

<< नवी कविता>>
#मातीची_क्रांती🎊🎊

जगण्या आनंदी बापा
यावा पाऊस टपोरा।
भुई तहानली आता
तरी नाही केला पेरा।।

जन्म राबतो शिवारी
दाद द्यावी सरकारा।
कित्येक जागल्या राती
रानी भिजवाया सारा।।

क्रांती मातीची घडावी
येवो कणसा चांदणं।
किती दिवस असेच
आशा घेऊन नांदणं।।

© विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱 8379977650

कविता

हे विठ्ठला...💗💓💗

कोरड्या वाटेचे पायी
उमटले ठसे सारे,
जीव गुंतला पंढरी
दाटली चंद्रभागा रे.

लय सोसल्या ठोकरा
तुझी व्हावी गळाभेट,
माय बाप पंढरी तू
उजळावी पायवाट.

लळा तुझा पांडुरंगा
आजी लागला अपार,
नको मला लूट तुझी
व्हावं हिरवं शिवार.

© विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱8379977650

आवडल्यास जरूर शेअर करा.💗💗

कविता

रिते आभाळ असते तेव्हा...😶😶

सुसाट वाहतो वारा पेरलेली वेळ असते तेव्हा
किती अपेक्षा ठरतात फोल रिते आभाळ असते तेव्हा.

एक एक काकरी जवळ जाऊन बघ।
वांज गाभुळ माती हातात घेऊन बघ।
जीवन खिन्न वाटेल, आभाळ ओलं वाटेल,
पाखरांचा आवाज सांगू पाहिल तुला काही।
आणि तू एका कटाक्षाचा प्रयत्नही करणार नाही।
जीव मुठीत धरून तू वर पाहशील तेव्हा....
किती अपेक्षा ठरतात फोल रिते आभाळ असते तेव्हा.....

सुसाट वाहतो वारा पेरलेली वेळ असते तेव्हा
किती अपेक्षा ठरतात फोल रिते आभाळ असते तेव्हा.

वावर मुकं मुकं वाटेल..,
डोक्यात धुकं धुकं दाटेल..।
दूरवर पिंपळ सळसळ, चिव चिव ऐकू येईल,
कुण्या पडक्या छप्परात पावश्या गाणं गाईल।
तू कवेत घे बियाणं, भुईला बिलगण्याचा प्रयत्न कर,
कानात तुझ्या गलगा, ऊब लागेल खूप तेव्हा...
किती अपेक्षा ठरतात फोल रिते आभाळ असते तेव्हा.....

सुसाट वाहतो वारा पेरलेली वेळ असते तेव्हा....
किती अपेक्षा ठरतात फोल रिते आभाळ असते तेव्हा.

मातीचा आर्जव होईल,
तुझ्या डोळ्यात पाणी येईल।
एकाकी पडलेल्या तिफणीच्या गळ्यात पडशील,
मैलोनमैलचा दुष्काळ आठवून, हंबरून हंबरून रडशील।
पुन्हा साल गुमान सोस, पाठीवर कारभारणीचा हात फिरेल,
कित्ती कित्ती चुकलो आपण आभाळ ढगात झुरेल।
तू उपाशी सताड उघडे राती झोपशील तेव्हा,
किती अपेक्षा ठरतात फोल रिते आभाळ असते तेव्हा.....
रिते आभाळ असते तेव्हा....😑😑😑😑

________________😢😢😢😢_________________

प्रतिक्रिया कळवा।😑😑

©विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱8379977650

कविता

❤❤❤❤
खिडकीत एक थेंब आठवण होऊन झुलत राहतो,
मन कातर कातर होते मग गंधाळ गारवा येतो।।

पाऊस तळं, जुलमी डोळं सगळंच तेव्हा आठवतो,
नदी, नाले, समुद्र होऊन विरह घेऊन संथ वाहतो।

© विकास विठोबा वाघमारे

बाजार The play of education

कविता मराठी

एक वीज हात देते हातात माझ्या,
किती भरून येतो पाऊस आत माझ्या।।

हळवं बिळवं होतं तेव्हा सगळं अंतर्मन
येते पाठमोरी ती सोडण्या नाव पावसात माझ्या।

थेंब बिलगतो मजला तेव्हा कातरलेला क्षण,
अन जीव येत जातो तेव्हा श्वासात माझ्या।

होत जाते अंतर वजा गुलाबी गारव्याचे,
बावरा मी एकटाच उरतो भासात माझ्या।

© विकास विठोबा वाघमारे
8379977650
#कविता_विवा

कविता

एक पाऊस ❤❤

एक पाऊस तुला घे,
एक मला..
तू घेतल्याचा गुलामपणा नको सांगू
मी दिल्याचा आव नाही आणणार...

पहिला वहिला पाऊस
वाटून घेतला की
जरा कमी होतं
ओझं पावसाचं.. अन
वाढत जातो पाऊस
तुझ्या माझ्या मनात ...
निथळत... खळाळत... तुडुंब !

एक पाऊस तुला..
एक  पाऊस मला ❤❤❤

© विकास विठोबा वाघमारे
📱8379977650

शुक्रवार, २८ जुलै, २०१७

कधी संस्कारही महत्वाचा असतो!

धर्मांधता आणि गलिच्छ विचारांनी बरबटलेल्या एका माथेफिरू लोकप्रतिनिधीने (?) केलेलं विधान हे काही धक्का बसणारं किंवा खूप जिव्हारी लावून घेण्यासारखं मला अजिबात वाटत नाही आणि भारतीयाला वाटूही नये। मी वंदे मातरम म्हणणार नाही असं ज्यावेळी मुखातून वदलं जातं त्यावेळी ज्या भुईला माता म्हणतो त्या भुईचे पांग फेडण्याची त्याची लायकी, कुवत नसते असं मी मानतो।

एक आमदार, स"माज"वादी पक्ष, दोन मतदारसंघातून निवडून आलेला वगैरे वगैरे आणि त्यांचा तथाकथित माज। नुकतीच या देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी झाली. त्याच दरम्यान ही जमात असं काही बरळते ते या देशाचं दुर्दैव आहे. या भूमीला स्वातंत्र्य करण्यासाठी गायलेलं वंदे मातरम म्हणायची लाज वाटणं म्हणजे आईला आई म्हणायला लाज वाटण्याच्या पलीकडचे आहे। ज्या देशासाठी हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिलं, भूमातेला वंदन करणारी माणसं आजही आम्ही पाहतो. गायक ए. आर. रहेमान यांनी वंदे मातरम गायलं. या देशाला धर्माच्या भाषेत बोलायच्या म्हंटल तर मुस्लिम देशभक्तांची कमी नाहीय पण भडकावून व्यवस्था गढूळ करू पाहणाऱ्या हरामखोरांचा देश असू शकत नाही हे जाणलं पाहिजे। हाकलून लावण्या इतका वेळही इथे दवडणे चुकीचेच।

भारत हा माझा देश आहे ही प्रतिज्ञा जेव्हा अभिमानाने म्हणतो न तेव्हा हा भारत माझा असतो। अगदीच माझा। आणि तेव्हा मी भारताचा असतो। वंदे मातरम हे माझ्या देशाचं गुणगान असलेलं गीत म्हणजे जनमनाला चेतवणारं रसायन आहे। अबू आझमी, वारीस पठाण सारख्या माथेफिरू आणि तथाकथित लोकांमध्ये जेव्हा अशी मूर्खपणाची लक्षणे दिसतात तेव्हाच त्या बुद्धीची कीव येते। आणि अशी मानसिकता असलेले लोकप्रतिनिधी सभागृहात बसतात तेव्हा राष्ट्र, राज्य समृद्धतेचा कोणता विचार करत असतील हे संशोधनात्मक आहे। जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचा प्रवास ज्याठिकाणी करतो आहोत त्यावर प्रेम न करणारी जमात ही देशाला घातक तर आहेच पण या देशाच्या अंतर्गत सुरक्षेला, व्यवस्थेला आणि विकासाला बाधक आहे, हे नक्की। एका अबू आझमी, वारीस पठाणाने देशाला घंटा फरक पडणार नाही कारण त्याअगोदर हजारो कलाम या देशांत घडवणारी माती आहे ही। पण काळ सोकावू नये म्हणून जागीच ठेचलेलं बरं। सगळेच देशभक्ती आणि देशद्रोह्यांच्या पंगतीला नेण्याची आवश्यकता नाही बरंच काही आचार, विचार अन संस्कारांवर सुद्धा अवलंबून असतं!

© विकास विठोबा वाघमारे
सोलापूर

पटलं तर नक्की शेअर करा

बुधवार, २६ जुलै, २०१७

खाली पेट मैं किसका नाम लूँ ?

गोष्ट साधारण एक महिन्यापूर्वीची आहे. ठाणे स्टेशनवरून मी सोलापूरला रात्रीची सिद्धेश्वर पकडली. प्रचंड गर्दी होती त्यामुळे उभंच रहावं लागलं. कल्याण पर्यंत एका पायावर वगैरे थांबून गेलो आणि मग खाली बसण्याऐवढी जागा झाली. डोक्याचे केस विचित्र वाढलेले, दाढीला कधी तरी वस्तारा लावलेला असेल. अंगावरचा चेक्सचा शर्ट आणि जीन्स गुडघ्यांवर फाटलेली आणि पांढरा फुपाटा भरलेला असा वरवरचा पेहराव असलेला एक तरुण माझ्या समोर उभा होता. जागा झाली तेव्हा मटकन खाली बसला मग मीही मांडी घालून समोरच बसलो.

भाई, कहा जा रहे हो? - मी जरा कुचंबत अर्धवट हिंदी बोललो.
पूना जाना हैं। आप? बिहारी टोनिंग धावत्या शैलीत बोलून मोकळा झाला.
मैं सोलापूर, आपका नाम? - पुन्हा मी।

संदेसकुमार. क्या हुवा?

कुछ नहीं भाई। पूना किस लिये जा रहे हो? मी आगाऊ प्रश्न विचारला।

हमरा साब हैं न वहा। साईड सुरू हैं।

हं, आप कहा से हो? मी

बिहार से, लेकिन अब पूना, बंबय घुमते रहते हैं।

अशाच गप्पा रेल्वेत खाली फतकल मांडून आम्ही बोलत होतो. मग पुढे बेकारी, बेरोजगार, भ्रष्टाचार, राजकारण, व्यवसाय, महागाई आणि स्थानिक व्यवस्था असं सगळं मी जाणून घेतलं।

23-24 वयाचा एक तरुण मात्र त्यांच्यामध्ये जोश, उत्साह, सळसळतापणा, कर्तृत्ववान, स्वाभिमान वगैरे काहीच उरलेलं मला जाणवलं नाही। पण त्या प्रवासात बिहारचं वैराण अन जळजळीत वास्तव ऐकून जीवाला वाईट वाटण्याशिवाय पर्याय नव्हता।

भाऊ, मी इकडे मुंबईला 19 व्या वर्षी आलो. टाईल फरश्या बसवायला शिकलो आणि मग हळूहळू काम मिळू लागलं। आमचा ठेकेदार असतोरोज आम्हाला 160 रुपये देतो। आम्ही व्यक्तिगत काम केलं तर पैसे जास्त मिळतील पण जीवाला प्रचंड धोका आहे। हाताने करून खायचं, वर्षातून एकदा बिहारला जातो, महिन्याला सगळं जाऊन 3 हजार हातात राहतात। व्यसन लागलं त्याला वेगळाच खर्च येतो। बिहारला राहून तिथेच छोटमोठं काम का करत नाहीस? यावर म्हणाला गेल्यावर्षी असाच विचार करून गेलो, 7 महिने घरीच बसलो, एकदाही काम नाही मिळालं, गावात साधी लाईटसुद्धा नाही इंडस्ट्री तर जवळपास अजिबात नाही, मोठा भाऊ आहे गाड्यांचे पंक्चर काढतो। आई बाप म्हातारे झाले। इकडे आम्ही गावातील 600 पेक्षा जास्त तरुण आलोय। गावाची लोकसंख्या 13 हजारच्या आसपास असेल म्हणाला। पण गावात खूप कमी लोक राहतात सगळ्यांनी बिहार सोडलंय। लालूसाहेब कोण माहीत नाही बोलला, मोदी माहितेयत। आमच्या इथे आमदार नाही म्हणाला, (त्याला काहीच देणंघेणं नव्हतं)। किती दिवस हे काम करणार तर म्हणाला भाई, जिंदगीभर तो करना ही पडेगा, मैं भी गांव जा के ऐशोआराम जिंदगी जीना चाहता हूँ। पर जिंदगी का गाड़ा कैसा चलेगा? हमे सुबह का खाना हमेशा सपनो में आता हैं। पूरा देस मोदी कहता हैं पर मैं खाली पेट किसका नाम लूँ? यहां बम्बई में आया पहला बहोत लोगों ने काम का पैसा डुबाया। जवाब मांगा तो उन्होंने गालियां सुनाई. मैं तो परप्रांतीय हूँ। जो संभाल लेते हैं और जितना पैसा देते उनका काम करता बस्स। यही जिंदगी भैय्या लोगोंकी हैं  दोस्त। जीने की तलाश में आज बम्बई, कल पूना परसों पता नहीं।

पुन्हा पुन्हा नवनिर्माणाची व्यापक व्याख्या आणि राष्ट्र परिवर्तनाच्या असंख्य व्हावटळांनी मेंदूला घेरलं होतं। एक भैय्या आणि मी बिहार, रोजगार, भविष्य आणि फरपट बस्स इतकंच त्या क्षणाला भिनलं। लालूंनी चारा खाल्ला, यादवी पिलावळींना मोहमाया आणि खुर्च्या दिल्या, नितीशकुमारांनी समाजवाद्यांचे राजकारण केलं। चूक कुणाचीच नाही। समाज निरक्षर राहिला न त्याचा हा परिणाम असतो। एव्हाना पुणे आलं तो हात मिळवून मिलेंगे म्हणत निघून गेला अन मला त्याचं ते वाक्य छळू लागलं, " पुरा देस मोदी कहता हैं, पर मैं खाली पेट किसका नाम लूँ?

शनिवार, २२ जुलै, २०१७

ग्रेट लीडर बड्डे

पार्ट पहिला:-
बोटावर मोजणाऱ्या टक्केवारीच्या जातीतला एक माणूस मुख्यमंत्री झाला।(जगातलं आठव आश्चर्य नाही तरीही) हे केवळ लक्ष्यात येणं हेसुद्धा भाग्याचं असतं बरं।

जात आडवी येतेच। गेल्या अडीच- तीन वर्षातला प्रवास बघा। पण जातबीत खुंटीला टांगून परिवर्तन आणि विकासाची व्यापक व्याख्या तयार करणाऱ्या व निडर लढणाऱ्या ग्रेट नेत्याला हॅपीवाला बड्डे। जिओ CM साब❤❤

पार्ट दुसरा:-

बक्कळ पुरोगामीत्वाची झुल अन काकांचा वरदहस्त पाठीवर असताना धरणग्रस्त होणं ज्यांच्या नशिबी आलं। मोठ्या मनानं रांगडा गडी म्हणून पुन्हा सक्रिय बिक्रिय होऊन यात्रा काढली। मनापासून थोडा थोडा आवडतो तो पुतण्या मलाही। त्या जाणत्या काकांच्या पुतण्याला बक्कळ मोठं होण्याच्या सदिच्छा। (म्हणजे सीएम बीएम 😜😜)


(दोन नेते, दोन पक्ष, दोन विचारसारण्या हे सगळं घेऊन एकाच क्षेत्रात वावरणाऱ्या दोन तुफानी वादळाला बड्डेवाल्या शुभेच्छा। जिओ जी भरके❤❤❤❤)

© विकास विठोबा वाघमारे
8379977650

शनिवार, ८ जुलै, २०१७

जिद्दीची कहाणी आनंदी आनंद..

"नापास म्हणजे आयुष्याच्या प्रगतीला बसलेली खीळ" असा समज करून तथाकथित समाजाचे टोमणे सहन करणाऱ्या जिंदादिल अन धडपडी युवकाच्या आयुष्याची कथा संपूर्ण देशात हिंदीमध्ये नववीच्या पाठ्यपुस्तकात  विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी घेतली गेलीय।

एक काळ असा होता की नापास झाल्यावर ज्या समाजानं धुडकावून लावलं। छोट्या घरातल्या पोरासोरांनी मोठी स्वप्न पाहण्याचं पाप करू नये ही भावना व्यक्त केली। मेकॅनिकल असणाऱ्या बापानं, आपल्या दुधावर विश्वास ठेवून आईने अन डोळसपणे आयुष्याच्या व्हावटळात नौका शोधणाऱ्या मित्रांनी आधार दिला। मिळालेल्या अपमान आणि खंबीरपणे पाठीशी उभे असणाऱ्या कुटुंबामुळे एव्हरेस्ट शिखर सर करून जगातील 4 खंडातील 4 सर्वोच्च शिखरं सर करण्याची भरीव कामगिरी अभिमानाने पार पाडली। त्याच हरहुन्नरी दोस्ताचे नाव डॉ. श्री. आनंद बनसोडे.

2012च्या नंतर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ओळख झाली तेव्हा आनंद दादांच्या घरी भेटवस्तू पोहोच करण्याच्या निमित्ताने गेलो। छोट्याशा घरात भरगच्च चौफेर सन्मानचिन्हं पाहिली। मातृत्वाची गडद किनार अन पितृत्वाची सावली पाहिली।

दरम्यानच्या काळात "स्वप्नातून सत्याकडे... एव्हरेस्टची स्वप्नपूर्ती" हे आत्मचरित्र आणि आंबट गोड कधी विसरता न येणाऱ्या आठवणी आणि जिद्दीची कहाणी असलेलं पुस्तक मला दादांनी भेट म्हणून दिलं. भरभरल्या डोळ्यांनी झपाटून काढल्यासारखं संपूर्ण पुस्तक कितीदा वाचून काढलं आठवत नाही। समाजव्यवस्थेच्या तथाकथित प्रवाहाच्या बाहेर असलेल्या गावंडळ व नापास पोरांनी खिसा तपासून स्वप्नं पहावी हा जणू अलिखित नियम असल्याचं अनेकदा दादांनी अनुभवलंय। ज्या वर्गात नापास झाले त्याच वर्गाच्या अभ्यासक्रमात पाठ शिकवला जावा यापेक्षा सर्वात मोठा स्वप्नपूर्तीचा आनंद किती मोठा!

सेव्हन समीट मोहीम आखली आणि 4 शिखरं पार केल्यानंतर आकस्मित पराकोटीचं दुःख आयुष्यात आलं। उमेदीचा काळ... हिंमतीने लढण्याचा निर्धार ... आणि काळानं मांडलेला खेळ या चक्रव्ह्यूवातून अलगद बाहेर पडत युनायटेड नेशनच्या जागतिक शांतता परिषदेपर्यंत मजल मारली। अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर नोंद केली।

लहानपणी एकीकडे एव्हरेस्ट शिखर खुणावत असताना मोकळा खिसा सतत मनात घोंगवायचा त्याच काळात वाळूच्या ढिगाऱ्यावर उभा राहून जगाच्या सर्वोच्च शिखराची उंची मोजणाऱ्या मुसाफिर डॉ. आनंद अशोक बनसोडे या माणसाला सलाम। मनःपूर्वक शुभेच्छा।

©विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱 8379977650

शुक्रवार, ७ जुलै, २०१७

रिते आभाळ असते तेव्हा...

सुसाट वारा वाहतो पेरलेली वेळ असते तेव्हा
किती अपेक्षा ठरतात फोल रिते आभाळ असते तेव्हा.

एक एक काकरी जवळ जाऊन बघ।
वांज गाभुळ माती हातात घेऊन बघ।
जीवन खिन्न वाटेल, आभाळ ओलं वाटेल,
पाखरांचा आवाज सांगू पाहिल तुला काही।
आणि तू एका कटाक्षाचा प्रयत्नही करणार नाही।
जीव मुठीत धरून तू वर पाहशील तेव्हा....
किती अपेक्षा ठरतात फोल रिते आभाळ असते तेव्हा.....

सुसाट वारा वाहतो पेरलेली वेळ असते तेव्हा
किती अपेक्षा ठरतात फोल रिते आभाळ असते तेव्हा.

वावर मुकं मुकं वाटेल..,
डोक्यात धुकं धुकं दाटेल..।
दूरवर पिंपळ सळसळ, चिव चिव ऐकू येईल,
कुण्या पडक्या छप्परात पावश्या गाणं गाईल।
तू कवेत घे बियाणं, भुईला बिलगण्याचा प्रयत्न कर,
कानात तुझ्या गलगा, ऊब लागेल खूप तेव्हा...
किती अपेक्षा ठरतात फोल रिते आभाळ असते तेव्हा.....

सुसाट वारा वाहतो पेरलेली वेळ असते तेव्हा....
किती अपेक्षा ठरतात फोल रिते आभाळ असते तेव्हा.

मातीचा आर्जव होईल,
तुझ्या डोळ्यात पाणी येईल।
एकाकी पडलेल्या तिफणीच्या गळ्यात पडशील,
मैलोनमैलचा दुष्काळ आठवून, हंबरून हंबरून रडशील।
पुन्हा साल गुमान सोस, पाठीवर कारभारणीचा हात फिरेल,
कित्ती कित्ती चुकलो आपण आभाळ ढगात झुरेल।
तू उपाशी सताड उघडे राती झोपशील तेव्हा,
किती अपेक्षा ठरतात फोल रिते आभाळ असते तेव्हा.....

________________😢😢😢😢_________________

©विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱8379977650

मंगळवार, ४ जुलै, २०१७

वारकरी कविता

हे विठ्ठला...

कोरड्या वाटेचे पायी
उमटले ठसे सारे,
जीव गुंतला पंढरी
दाटली चंद्रभागा रे.

लय सोसल्या ठोकरा
तुझी व्हावी गळाभेट,
माय बाप पंढरी तू
उजळावी पायवाट.

लळा तुझा पांडुरंगा
आजी लागला अपार,
नको मला लूट तुझी
व्हावं हिरवं शिवार.

© विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱8379977650

आवडल्यास जरूर शेअर करा.💗💗

सोमवार, ३ जुलै, २०१७

कविता


मातीची क्रांती...

जगण्या आनंदी बापा
यावा पाऊस टपोरा।
भुई तहानली आता
तरी नाही केला पेरा।।

जन्म राबतो शिवारी
दाद द्यावी सरकारा।
कित्येक जागल्या राती
रानी भिजवाया सारा।।

क्रांती मातीची घडावी
येवो कणसा चांदणं।
किती दिवस असेच
आशा घेऊन नांदणं।।

© विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱 8379977650
Vikas Waghamare

रविवार, २ जुलै, २०१७

जेष्ठांच्या पडझड अन जीवघेण्या रंगील्या उन्हातून आषाढी पालवी दिल गार्डन गार्डन करत अलगद शिवारी येते।

पहिल्या वहिल्या आभाळ मोत्यांनी माय बापाचं शिवार फुलारून येऊ लागतं। पाखरांना गायला गळा येतो तर वासरा-कोकरांना रानोमाळ हुंदडायला पाय येतात। लाहीलाही उन्हानं खंगलेल्या घटका मोजणारी म्हातारी माणसं अजून एक साल म्हणून आनंदी होतात। रानोमाळ पाण्याचे पाठ अन कुसळाची पालवी बाळसं धरते तेव्हा खऱ्या अर्थाने जनावरं यथेच्छ चरायला धावतात। लुगड्याचा पदर कंबरेला खवत डोक्याला फाटक्या टावेलाची टापर बांधून चार दोन हाड-कातडं येक झालेल्या जनावरांना घेऊन कुणाची माय माळरान जवळ करत जनावर हिवराला गुतवून बसते।

रोजगार हमीच्या कामानं नालाबल्डिंगी टच्चं भरलेल्या पाहिल्या की हमेशा माय बापाला फोडं आठवून उन्हाळ्याच्या झळा भर आषाढात अंगावर येतात। कुणाचं श्येत नांगरून घ्यायचं तर कुणाचं बळी-पाळी। तर कुणाची ब्याची तयारीच दिवाळीच्या सणापेक्षा जोमदार सुरू होते. पहिल्या पावसानं मनाला भिजवलं, वावार भिजवलं अन त्यातच घराच्या छप्पराच्या चगळातून अलगद आत येणाऱ्या काळसर इटकरी धुराच्या पाण्यानं घराच्या फाटलेल्या रूपाचं दर्शन होतं। कुणी पास झाल्याचं पेढं देतं तर कुणी नापास झालं म्हणून जनावरांचा खांडवा घेऊन माळावर इटी दांडूवर अन गोट्याच्या खेळात धुंद होतो। "काळ्या मातीत मातीत तिफन चालते...." "यावं यावं हो बैलाला.... चल सर्ज्यागी.." अशा गाण्यानं शिवारभार गलगा होतो। माऊली माऊली गजर कानोकानी सुरू होतो तेव्हा इठूवर जीव ओवाळून टाकणारा बा साऱ्या संसारातून पंढरीच्या दिशेनं ओढला जातो। वावर अन मातीला मनसोक्त भिजवत काळी भुईत दडलेल्या जीवाला जीव देणाऱ्या आषाढाला सारं शिवार हिरवाईनं नटून झुलत असतं। गुलाब, मोगऱ्याच्या सुगंधाची जागा शेताभातातल्या मातीच्या गंधानं घ्यायला सुरुवात होते... तेव्हा खरा मन मोराचा पिसारा फुलू लागतो।

विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱 8379977650

शनिवार, २४ जून, २०१७

#माय_बाप_जिंकले!🎊🎊😘
श्रेय घेणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं।

#विस्तृत_माहिती.......💗👇👇

#अभूतपूर्व कर्ज माफी झाली म्हणायला हरकत नाही।
राज्यात रेकॉर्ड ब्रेक म्हणजे 34000 कोटींचे कर्ज माफ करणारे सरकार नक्कीच कौतुकास पात्र आहे। कर्जाच्या ओझ्याखाली माय बापाची मान दबली गेली अन आयुष्याचं जु ओढता ओढता मातीला मिळालेल्या 90 % शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार। काँग्रेसनं 8000 कोटींचे कर्ज माफ केले होते तेही केवळ जिल्हा मध्यवर्ती बँका अन वित्तीय संस्थांची मुनीमगिरी करून घरं भरण्यासाठी. देशातील इतर सर्व राज्यापैकी महाराष्ट्रातील कर्ज माफी सर्वात मोठी कर्ज माफी आहे। राजकारणाला हापापलेल्या बावळ्यांनी मुख्यमंत्र्यांवर किती हीन पातळीवर टीका केली मात्र आज त्यांनी खऱ्या अर्थाने अभ्यास पूर्ण करून विरोधकांना गृहपाठ करण्यास पाठवले म्हणायला हरकत नाही।

💗 आज मंजूर झालेल्या कर्जमाफीचा आढावा-💗
      छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून ही ऐतिहासिक कर्जमाफी केलीय। १.५० लाख रुपयांचे कर्ज सरसकट माफ करणे हेच खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी महत्वाचं पाऊल ठरणार आहे। तत्काळ महाराष्ट्रातील अगदी शेवटच्या शेतकऱ्यांचा आढावा घेऊन व अभ्यास करून आज 89 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची ही सरकारने केलेली उत्तुंग कामगिरी आहे। त्यामध्ये मध्यम मुदतीचे कर्जसुद्धा माफ होणार आहे। यामध्ये 40 लाख शेतकऱ्यांना 1.5 रु च्या OTS योजनेचा लाभ मिळणार आहे। नियमित कर्ज भरणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी 25 हजार अनुदान देणार म्हणजे अच्छे दिन वगैरे म्हणावे लागतील।
      शेतकरी माय बापाच्या आडून मेवा खाण्यासाठी सरसावणाऱ्यांना मात्र चार हात लांब ठेवण्याची योजना आखल्यामुळे "मुळांना थेट पाणी मिळणार" वगैरे म्हणूया।😜😀 त्यामध्ये आयकर भरणारे, आमदार,  खासदार, जि.प. व महानगर पालिका सदस्य, सरकारी कर्मचारी, व्हॅट लागू असलेले व्यापारी यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार नाही।

    घामाचा दाम मिळण्यासाठी आता हमीभाव देण्याच्या दृष्टीने तत्काळ पाऊल उचलावं म्हणजे पडणाऱ्या पाऊसासोबत येणाऱ्या पिकाला अन बापासोबत मातीला दिल गार्डन गार्डन वगैरे वाटायला हवंय। 😍😍💗

© विकास विठोबा वाघमारे
किसानपुत्र
📱8379977650
सोलापूर

गुरुवार, १५ जून, २०१७

मग काय बोलू...😢

साधारण दुपार 2 ची वेळ असेल। मी मेसमध्ये जेवण करत होतो। उच्ची पुरा बांधा, इन शर्ट, बेल्ट अन रुबाबदार पेहराव। मात्र बोलण्याची धाटणी बऱ्यापैकी ग्रामीण कम शहरी । कोल्हापूर परिसरातल्या ग्रामीण भागातले मात्र शहरात अधिकारी होते असं समजलं।

दोन शिवाराचं रांगडं अधिकारी वाटावेत असे मात्र शेतकरी होते। शहरात असल्याने लवकर लक्षात येणं तसं कठीण होतं। मात्र जे काही माझ्या कानावर आलं ते विचित्र वगैरेच्या पलीकडं होतं....

पहिला:- कर्जमाफी करून सरकारनं मला ** लावला.

दुसरा:- का? अहो ग्रामीण भागात आहे तशी परिस्थिती, हं, कोल्हापूर वगैरे ठिकाय। पण मराठवाडा, विदर्भ ..? .(प्रश्नार्थक नजरेनं संवाद थांबवला)

पहिला:- भाई, लोकांचा विचार करूनच झालं हे। माझंपण "चार लाख पंचेचाळीस हजार" कर्ज होतं.!

दुसरा :- हं, होईल ना माफ मग...

पहिला :- कसलं माफ । मार्च एंडला बँकेकडून फोनवर फोन यायले, म्हणून शिल्लक होते त्याचं सर्व कर्ज भरलं। अन आता सरकारला सुचलं.. मीच ** घातली नसती तर बरं झालं असतं. 😡

दुसरा :- .......

पहिला :- आता पुढच्या आठवड्यात गावाकडं गेलो की बँकेत जाऊन बघतो आता... काय होतंय.

हरामखोर साले, करायचं तर पहिल्यांदाच करायचं न आता मला काय मिळणार आहेत का परत पैसे..?

                _____________________


शुश्शश्श....😢😢😢
आता काय बोलू?

ते ना माझ्या ओळखीचे होते ना गाववाले।
बाप झिजतो न मातीत,
उगाळत राहतो पानापानात,
प्रामाणिकतेची लागण करत तण उपटून टाकत असतो।
वावरभर सैरभैर फिरून झालं की कोणत्या ठिकाणी
कुण्या जातीचं पीक येतं हेसुद्धा भविष्य खरं ठरवतो।
पावसापाण्याची आबाद करण्यासाठी
म्हसोबा, मरीआई, लक्ष्मीआई अन वड्यातल्या ताईबाईला
अनवाणी हेलपाटे घालून उबवत राहतो शेत। तुमच्या माझ्यासाठी पीक।

ऑफिसात बसून शेती करणाऱ्या शतकरी कम साहेबा, कर्ज आनंदासाठी नाही केलं माफ, कुणाचा होतकरू बाप
कुण्या नाला बल्डिंगिवर ताटकळत उभ्या असलेल्या बोरी, बाभळीच्या फांदीला गळ्यात घेऊ नये म्हणून केलंय...!

एकदा पिकलं तर सोन्यावणी शिवार दिसलं न तर पांग फेडलं सरकारनं म्हणंल।

शहर सिटीच्या जातिवंत साहेबांनो, तुम्ही एसीच्या हवेलीतील शेतकरी आहात न। पण धग अजून तुमच्या चंदेरी खुर्चीला नाही पोहचली। एकदा पोहचेल न तेव्हा बघा।😢😢😢

© विकास विठोबा वाघमारे
किसानपुत्र
📱 8379977650
सोलापूर

मंगळवार, १३ जून, २०१७

अभिनंदनीय असं काही...

एकीकडे महाराष्ट्रात शेतकरी संपाने समस्त वातावरण चलबिचल झालं असलं तरीही शेतकरी, कष्टकरी अन अंत्योदय घटकाला सन्मान आणि समृद्धता प्राप्त करून देण्यासाठी सत्तेवर आलो आहोत अशी गर्जना करणाऱ्या भारतीय जनता पार्टी आता अडीच - तीन वर्षांचा उंबरठा ओलांडू पाहत आहे.

"शासन-प्रशासन-समाज" ही त्रिसूत्री जर समांतर चालली तर महाराष्ट्राला पुनरवैभव प्राप्त करून देऊ हे भाजपाने पाहिलेलं स्वप्न निश्चितपणे बऱ्याच प्रमाणात आज सार्थ ठरवताना दिसत आहे। मागेल त्याला शेततळे योजना गेल्या अडीच-तीन वर्षांपूर्वी असल्याची किंवा कुण्या सामान्याला त्याचा लाभ मिळाल्याचे माझ्या ऐकण्यात वा पाहण्यात नाही। आज मात्र तमाम शेतकऱ्यांना गरज असेल तर लाभ देणारच असल्याचे सांगितले जातेय आणि होतंय।

महाराष्ट्रातील जिल्हा मध्यवर्ती बँकांना सावरण्यासाठी किती वेळ लागेल हे सरकारही नक्कीच सांगू शकणार नाहीत एवढं भोग आजही त्या बँकांच्या माथी आहेत। गावागावातील विविध विकास सोसायट्यांना उजेडात आणून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी त्यांची झाडाझडती घेतली। आता ज्याच्या नावावर सातबारा त्यांना मतदानाचा अधिकारसुद्धा दिला गेला। तुमच्या माझ्या अवती भोवती नक्कीच चांगलं काहीतरी घडतंय।

शिक्षण, आरोग्य, कृषी, कौशल्य, रोजगार आदी अनेक विभागात नक्कीच "न भूतो..." असं कार्य सुरुय...।

व्यवस्था परिवर्तन करत असताना नक्कीच वेळ लागतो हे माहितेय आणि ते परिवर्तन घाईत होऊ नये याचीही काळजी घेतली जावी हेसुद्धा तितकेच महत्वाचे आहे।

गेली दहा-बारा दिवस शेतकरी माय बापाच्या शोषणाविरुध्द राज्यभरात एल्गार झाला त्यामध्ये नाही म्हणायला राजकारण सुद्धा झाले। मात्र शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कर्जमुक्तीच्या लढ्याला सरकारने तत्काळ संवेदनशीलता दाखवून हिताचा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला। आता पावसाचा हंगाम सुरू झालाय। गावशिवारात आता पेरणीला मोठ्या प्रमाणात सुरुवात होईल मात्र सरकारने हाती मिळालेल्या अडीच-तीन वर्षात या माझ्या महाराष्ट्राला किंवा सर्वात पुढे वगैरे म्हणणाऱ्या त्यांच्या महाराष्ट्राला काय दिलं आणि आम्ही काय घेतलं हेसुद्धा अत्यंत महत्वाचं आहे।

पहिल्या पावसात राज्यातल्या अनेक ठिकाणी शिवारा शिवारात भरून वाहणारे ओढे अन आनंदानं धो धो बरसणारे गप्पांचे घोळके नक्कीच पाहायला मिळताहेत। शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस आणायचे असतील तर व्यवस्थेच्या विरोधात मात्र गलबला न करता काही करण्याचं पहिलं पाऊल टाकता यायला हवं। गावशिवार आनंदाने वाहत असताना सोईस्करपणे सरकारला विसरून चालणार नाही। जे चांगलं आहे ते चांगलं म्हणण्याची उत्कट भावना तुमच्या माझ्यात निर्माण झाली पाहिजे। साठ वर्षात ज्या शिवारात देवाच्या कृपेने पडणारे पाणीही वाहू शकत नव्हते त्याच शिवारात तेच पाणी बांधाबांधांमध्ये जिरवले जातेय आणि ओढा रुंदीकरण, खोलीकरण करून गावाला अत्यंत सुबक असा चेहरा देण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे।यालाच खऱ्या अर्थाने जलयुक्त शिवार असं म्हणायचं।

केवळ अंध विरोध करण्यानं भलं कुणाचंच होत नाही डोळ्यांना दिसणाऱ्या आणि मनापासून कार्य करणाऱ्या व्यवस्थेला कधी कधी या हृदयीची त्या हृदयी मनापासून धन्यवाद द्यायला हवा।

@ सोबत अनगर ता. मोहोळ येथील ओढा रुंदीकरण व खोलीकरणामुळे पहिल्या पावसात वाहणारा ओढा। जलयुक्त शिवार यालाच म्हणतात। हे पुनरवैभव नव्हे तर काय म्हणाल.....

अत्याधुनिक ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने श्री. देशमुख यांनी घेतलेले चित्र...

✍ विकास विठोबा वाघमारे
📱 8379977650
सोलापूर




शनिवार, १० जून, २०१७

तू भरून आल्यावर...😍😍

#भरून_आल्यावर_तू😍😍😘
खंडेराव परक्या गावात असतात। अंतर्मनाला गावच्या मातीची अन पावसापाण्याची ओढ लागलेली असते।मनात प्रचंड तगमग ....
मग बंधूना दूरध्वनी संभाषण करून ख्याली खुशाली व पडताळणी अन मग पाऊसपाण्याच्या पाणीदार गप्पा झाल्यावर थेट छायाचित्रांचा हट्ट करून हे भरून आलेलं अख्खं आभाळ दूरच्या शहरात हाती मिळतं।

भरून आल्यावर तू
काळजा तृप्ती मिळते।
घेता मिठीत भूमीला
बघ माती गंधाळते।

© Vikas Waghamare
 📱8379977650
सोलापूर



बुधवार, ७ जून, २०१७

तू गेलीस तेव्हा...

केसातला चाफा
किणकिण कंगणचाळा
परसातल्या मोगरपाकळ्या
काळजातली तार
आठवणींचं मोरपीस..

हे एकाकी हाती राहीलं....

तू गेलीस तेव्हा...
दरदरून मोत्या मोत्याच्या
हिशोबानं खळखळ
झुळझुळ अन रेशीम थेंबानं
माझं अंगण भरून वाहिलं...

तू गेलीस आणि मग
तुझ्या माझ्या आणि....
यातनांनी बाजार मांडला...
बेमालूमपणे हरेक याद
उसळून आली
मोरपीस अन गिफ्टेड
सग्गळं सग्गळं
जाब विचारू लागले
एका मोत्यांच्या चांदणीनं
पहिल्या वहिल्या
पावसाला अंगावर पांघरत
"एकटं" जाणं..
अन तू एकाकी पाहणं
शोभतं का..?💞💗💞

© विकास विठोबा वाघमारे
📱 8379977650

मंगळवार, ६ जून, २०१७

संप संपला आता राजकारण सुरू...

भावांनो, गेल्या 1 जूनपासून आपण सर्वजण बापाच्या यातना सरकारकडे मांडण्यासाठी एल्गार करत होतो। शेतकऱ्यांच्या घरापर्यंत अच्छे दिन आले पाहिजेत यासाठी समस्त बांधव एक होऊन लढलो।
खरंतर शेतकरी संप हा केवळ मोदींच्या किंवा फडणवीस, भाजपाच्या सत्तेमुळे आला नाही हे वारंवार सांगितलं मात्र गेल्या 60 वर्षात दरोडेखोरांनी तुमच्या माझ्या बापाला लुटलं हे वास्तवसुद्धा आपल्या समोर मांडलं।

महाराष्ट्राच्या मातीमध्ये सोनं उगवण्याची ताकद आणि मनामध्ये इच्छाशक्ती आहे त्याला सरकारने खऱ्या अर्थाने कर्जमुक्ती, हमीभाव द्यावव व आदी मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आक्रोशाला संवेदनशीलता दाखवून शेतकरी माय बापाच्या या मागण्या संवेदनशील सरकारने मान्य केल्या।

भावांनो, 60 वर्षात आजपर्यंत केवळ स्वार्थाचे राजकारण करणाऱ्या भ्रष्टवादी दरोडेखोरांना आता मोठी चपराक बसली आहे। महाराष्ट्राचा शेतकरी कुण्या पक्षाच्या, कुण्या झेंड्याचा आणि कुण्या नेत्याच्या पाठीमागे या संपात सहभागी झाला नव्हता। शेतकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात आपला पाठिंबा या संपासाठी केवळ शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनाला दिला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी या मागण्याच्या अंमलबजावणीसाठी काही अवधी मागितला आणि असलेल्या मागण्या येत्या 4 महिन्यात पूर्ण करण्याचे वचन दिले।

भावांनो, हमीभाव नक्की देणार हेसुद्धा सांगितलं। आणि मला सांगायला आनंद वाटतो की मी सरकारचा हितचिंतक असूनसुद्धा बापाने सहन केलेल्या 60 वर्षाच्या शोषणाविरुद्ध या एल्गारामध्ये सामील झालो होतो। केवळ एकाच गोष्टींमुळे की, माय बाप सरकार बापाला आजपर्यंत सहन कराव्या लागलेल्या अडगळीतून आता मुक्त करा।

1 ते 4 जूनपर्यंत महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने शेतकरी लढला । त्यातही काही प्रमाणात राजकीय कुरघोड्या करण्याचा प्रयत्न झाला। मात्र या नंतरच्या काळात या संपातून शेतकरी बाजूला झाला। आता खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात आपल्या माय बापाच्या नावानं राजकारण करण्यासाठी आणि राजकीय दुकान डागडुजीसाठी तथाकथित नेत्यांनी शेतकऱ्यांच्या आडून राजकारणाला सुरुवात केली।
भावांनो, आपला शेतकरी संप गेल्या 4 तारखेलाच संपलाय। सरकारने आता किसान क्रांती आणण्यासाठी पाऊल टाकलं आहे। संत सावता माळी आठवडी बाजारांची संख्या महाराष्ट्रात वाढवून थेट शेतकऱ्यांना फायदा होईल, मागेल त्याला शेततळी योजना असेल, हमीभाव निश्चित केल्यानंतर त्याची ठोस अंमलबजावणी करण्यासाठी सरकार सक्षम आहे ।

नुकताच संपाला पुढची दिशा देण्याच्या नावाखाली सुकाणू समिती स्थापन केली त्यात कोण तर राजकीय नेत्यांनी चलती। भावांनो जर राजकारण विरहित संप आपण पुकारला होता तर आता या नेत्यांनी त्यात सहभागी होऊन आणि पाठिंबा देऊन याची राजकीय धुळवड खेळण्याची संधी साधली आहे।

व्यवस्था परिवर्तन करत असताना सरकारलाही वेळ दिली पाहिजे आणि आंदोलन सुरू झाल्यानंतर संपले पाहिजे। येणाऱ्या काळात सरकारकडून अपेक्षा करूया की दिलेल्या शब्दानुसार तुमच्या माझ्या बापाची कृषी क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही।भावांनो आता सर्वांनी आपापल्या गावामध्ये व्यवहार सुरळीत करा। पावसाचे दिवस सुरू झाले आहेत मन लावून शेती करा। सोन्यासारखी दौलत शेतीमध्ये येईल। बंधूंनो, संपाच्या नावाखाली इथून पुढे राजकीय बळी जाऊ नये ही अपेक्षा।


( मागण्या सरकारने मान्य केल्यामुळे या लेखानंतर माझा संपामधील सहभाग संपला आहे।)

© विकास विठोबा वाघमारे
किसानपुत्र
सोलापूर


सोमवार, ५ जून, २०१७

#नमन_श्री_गुरुजी
साल 2012- 13 चं होतं। अभाविपच्या कार्यालयात मी नुकताच निवासाला आलो। नाथ प्लाझा हे निवासी कार्यालयाचे नाव. आतमध्ये भिंतीला एका बाजूला सिद्धरामेश्वरांचा भला मोठा बॅनर होता आणि दुसऱ्या बाजूला श्री. गुरुजी यज्ञाकुंडात हवन करत असलेलं एक पेंटिंग चिटकवलेलं।
त्या दरम्यान गुरुजी किंवा संघ परिवार जास्त सखोल माहीत नव्हता। मात्र हळूहळू सर्व समजत गेलं।

त्या भिंतीवर असलेलं गुरुजींचं पेंटिंग हे एक वेगळं रसायन वाटायचं। अनेकदा एकटक त्या पेंटींगला पाहून डोळे दिपून जायचे। हिंदुत्व आणि समरसता हे सगळं दरम्यानच्या काळात जमेल तेवढं अभ्यासायला मिळालं।
गुरुजींच्या प्रेरणा देणाऱ्या अनेक गोष्टी जेष्ठ कार्यकर्त्यांनी सांगितल्या। मात्र त्या पेंटिंगला पाहून आणि काही गोष्टी समजून घेऊन जी ऊर्जा मिळाली आणि मिळतीय ती पुढच्या संघर्षाला प्रेरणा देणारी ठरतीय।

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक श्री. गुरुजींचा आज स्मृतिदिन। शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा आणि त्याग करणाऱ्या गुरुजींना माझा प्रमाण।

© विकास विठोबा वाघमारे
सोलापूर
📱8379977650

रविवार, ४ जून, २०१७

नोटांची भाजी नसते होत....

बा तुझा घाम आता
पार आटून गेलाय।
करण्यास बंड तुला
फार उशीर झालाय।

जगण्याची धडपड सुरू
जिंदगीचा झालाय वांदा।
मिरची, गवार वावरी गेली
भावासाठी आतुर कांदा।

बांधापासून सरकारपर्यंत
जागोजागी होतीय झीज।
पैशाचं नसतं होत धान्य
कळेल तेव्हा तुझं चीज।

चार दोन दिवसात त्यांची
बघ कशी झोप उडाली।
गल्लीपासून महालार्यंत
आबळ जेव्हा झाली।

रुपयांची भाकर नाही
नोटांची भाजी नसते होत।
कळेल तेव्हा पडेल पाया
अदानी, अंबानी अन सदा खोत।

© विकास विठोबा वाघमारे
किसानपुत्र
📱837997650
सोलापूर

शेतकरीपुत्र असाल तर नक्की पुढे पाठवा।


शनिवार, ३ जून, २०१७

परिस्थिती संपाची

भावांनो तुमच्या माझ्या बापाच्या सन्मानासाठी लढत असताना सरकारला अजून जाग येत नाही। दहा हजार वेळा सांगतो की, हे पाप राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दरोडेखोरांनीच केलंय। चार दोन वर्षांपूर्वीचा झालेला सत्ताबदल हा तत्कालीन सरकार विरोधी प्रचंड आक्रोश असल्यानेच झाला हेही खरंय।

बापाच्या मालाला बाजारात कवडीची किंमत न देणाऱ्यांना पायउतार व्हावं लागलं। अब्जावधींची माया जमवणाऱ्यांना हाकलून देण्याचं धैर्य घर घर मोदी म्हणत याच शेतकरी बंधूंनी केलं। सरकारला कशाची घाई झाली की एका रात्रीमध्ये त्यांना हे निपडून काढण्याची धडपड करावी लागली।

हापापलेल्या तथाकथित पुढाऱ्यांना घेऊन शेतकऱ्यांची गोची करण्याचा प्रयत्न का करावासा वाटला?

मावळच्या आंदोलनात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तेव्हा ज्या यातना सदाभाऊ काळजातून येत होत्या त्या आता एक शेतकरी मारला तरी सत्तेत असून होत नाही, याचं नवल वाटतंय। ज्यांनी शेतकऱ्याला मारलं त्याच्या तोंडाला रगत लागलं। आणि ज्याच्या तोंडाला रगत लागलं त्याची जीभ आम्ही ओढून बाहेर काढू म्हणून महाराष्ट्रात थयथयाट करणारा नेता आज एका सत्तेसाठी गिळला गेलाय।

आर आर आबा बारामतीच्या फडावर मावशी म्हणून शोभताव म्हणणाऱ्या सदभाऊंना आपल्याला कधी कुण्या फडाची मावशी व्हावं लागलं याची कल्पनाही नसेल।

शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडून तीव्रता कमी करण्यासाठी ज्या पद्धतीनं आखणी झाली त्या सर्व प्रवाहात शेतकरी नेते म्हणवणारे फितूर झाल्याचे जगजाहीर दिसते आहे।

महाराष्ट्राला कृषिमंत्री आहे का? असा सवाल जनता विचारत असताना मात्र या सर्व घटनेनंतरही कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना अंधारात ठेवलं जातंय आणि सदाभाऊंचं कार्ड चालवून एल्गार बोथट करण्याचा डाव आहे।

संप महाराष्ट्राचा सुरू असताना अचानक बोटावर मोजण्या इतक्या दलालांशी चर्चा करण्याचे केलेले प्रयत्न आजच्या शेतकऱ्यांच्या धगधगीला कारणीभूत ठरताहेत।

शहराला आता खरी झळ बसायला सुरुवात झाली आहे। बाजारात भाजीपाला, फळे व दुध मंदीची लाट जाणवतीय। काळ्या मातीची अन बापाची होरपळ सरकारला कळेपर्यंत महाराष्ट्राला भारी किंमत मोजावी लागू नये म्हणजे मिळवलं।
© विकास वाघमारे
किसानपुत्र
📱837997650
सोलापूर

संप चिघळला जातोय सरकार

सकाळी पाचला उठून बातम्यांवर नजर टाकली तर दरोडेखोरांवर शिरसंधान करणारे माझे सरकार एका रात्रीत शेतकऱ्यांना बांधून ठेऊ पाहत होतं।

अरे ज्या शेतकऱ्यांना तुम्ही भेटून बोलू शकत नाही त्यांना न्याय देणार का हा सवाल आ वासून उभाय। दलालांना सोबत घेण्यास नकार दिल्यावर झोप उडते आणि मग कोण जयाजी सूर्यवंशी नावाचा तथाकथित नेता तुमच्या कामी येतो। हे दुर्दैव आहे माझ्या बांधवांचं। गडबड घाईत मिटणारा हा संप नाही। हा एल्गार पिढ्यानपिढ्या सोसलेल्या यातनांचा आहे।
या आंदोलनाला नेता नाही चळवळीचा प्रत्येक शेतकरी बाप आज आमच्यासाठी नेता आहे। एका रात्रीत जे काही झालं न त्याने सरकार जनतेचा विश्वास उडतोय।

जेवढं खाली दाबण्याचा प्रयत्न कराल तेवढि या एल्गाराची आग धगधगेल....

भावांनो, संप सुरूच आहे। आपल्याला फसवणाऱ्या शेतकरी नेत्यांना आता न जुमानता लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवा। स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठी क्रांती आपल्याला घडवायची आहे।
© विकास वाघमारे
किसानपुत्र
📱8379977650


#शेतकरी_संप #किसानपुत्र_आंदोलन

शुक्रवार, २ जून, २०१७

सरकारला किसानपुत्राचे खरमरीत पत्र..

अय सरकार तुम्हाला हात जोडून सांगतो। बापानं संप पुकारला आहे। तो गेल्या 60 वर्षाची गुलमगिरी आणि शोषण थांबवून सन्मान मिळविण्यासाठी।

कोणी जेष्ठ समाजसेवक आणून आम्हाला नेता जन्माला घालायचा नाहीये। आम्हाला आमच्या घामाची किंमत चुकती करण्यासाठी तुम्हाला लक्षात आणून द्यावं लागतं आहे।

मी मोदी द्वेषी, फडणवीस द्वेषी किंवा भाजपा द्वेषी नाही सरकार मात्र मी शेतकरीप्रेमी नक्की आहे। बापाला येडझवा म्हणणाऱ्या खोगिरांच्या विरोधात एल्गार करण्यासाठी चळवळ करतोय। या बांधाच्या त्या बांधाला रातभर विजेच्या एका झलकीसाठी पळणाऱ्या बापाला मला न्याय मिळवून घ्यायचाय।
काँग्रेस राष्ट्रवादीचे षडयंत्र हे माल उधळपट्टी करण्यात असेल। रस्त्यावर बळीराजाला आणण्यात असेल मात्र संप तर जनसामान्यांनी एकत्र येऊन बांधलेली वज्रमुठ आहे हे लक्षात घ्या।

काही दिवसांपूर्वी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली तूर हातात घेऊन भिकाऱ्यासारखा बाप तुमच्या दारात उभा होता आणि तेव्हाच साल्याची पैदास झाली न तिथंच पाणी मुरलं। आणि त्याचवेळी ती मूठ घट्ट आवळली गेलीय।

एकदा शेतकरी बंधूंच्या काळजाला कान लावून बघा सरकार धरणीचा आक्रोश काळजात ऐकू येईल। पोरींच्या लग्नासाठी रानात उगवलेल्या सोन्याच्या जीवावर काढलेलं कर्ज त्याला कासऱ्याची आठवण करून देतं। लाखो कोटींची पॅकेज जर "मेक इन इंडियासाठी देत असाल तर काही कोटींची कृपा मेक इन अनाजसाठीसुद्धा करा। तेव्हा खऱ्या अर्थाने कृषिप्रधान देशात कृषिक्रांतीची मशाल तेवेल.

सरकार शेतकऱ्यांच्या अंगावर धावून जाऊन हा एल्गार दडपण्याचं पाप नका करू। तरीही या यज्ञात आता एका बांधवांचा खून झालेलाच आहे। फुकट मागणाऱ्यातले आम्ही नाही सरकार, घामाची किंमत आणि जगण्याची हिंमत द्या एवढीच माफक अपेक्षा घेऊन रस्त्यावर आलोय।

जर थेट बोलायचं असेल तर या, बांधवांच्या गळ्यात गळा घालून बोला, शेतकऱ्यांच्या बांधावर या । कुण्या दलालाला किंवा मध्यस्थाला घेऊन भावनांचा बाजार नका मांडू। व्यवस्था परिवर्तन हे ध्येय घेऊन आलो आहोत।

आजपर्यंत शेतकरी नेता म्हणून मिरवत तत्कालीन शासनाशी हिजडवाद करणाऱ्या सदभाऊंना पाहून डोळ्यावर विश्वास बसेनासा झालाय। सदाभाऊनं किती लवकर कात टाकली😢😢!

हात जोडून सांगतो एकवेळ भरभरून शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करा आणि सकारात्मक ठोस निर्णय घ्या ।

या संपातसुद्धा राजकारणासाठी दडपडणाऱ्या भ्रष्टवादी दरोडेखोरांनो हा भोळा बाप पुन्हा फसणार नाही। आम्ही सामान्यांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीच्या मार्गाने लढू मात्र तो आवाज सरकार तुमच्यापर्यंत पोहचत नसेल तर आवाज पोहचवण्यासाठी जे जे करावं लागेल ते करण्याची ताकद काळ्या आईनं दिलीय। हे अश्रू भरलं पत्र स्वीकारा सरकार, अजून काय लिहू.... ? 😢😢😢😢

*बंधूंनो, नक्की हे पत्र प्रत्येक किसानपुत्राने पुढे पाठवले पाहिजे ही विनंती*🙏🏻

✍ विकास विठोबा वाघमारे
किसानपुत्र
📱8379977650
सोलापूर


गुरुवार, १ जून, २०१७

हे वास्तव शेतकरी संपाचं...!

गेली साठ वर्षे तुमचा आमचा बाप रोज थोडं थोडं मारतोय। आता संपाचं हत्यार उपसलं तेव्हा राजकीय दुकान डागडुजी करण्यासाठी हरामखोर तथाकथित नेते रस्त्यावर शेतकऱ्यांचा कळवळा घेऊ पाहताहेत.

भावांनो, हा एल्गार केवळ मोदींच्या आणि फडणवीस किंवा भाजपाच्या विरोधात नाहीय.

गेली साठ वर्षे ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने माझ्या शेतकरी बांधवांना मातीमोल केलं त्याचं पाप आहे.गावागावातील विविध विकास सोसायट्या आघाडीच्या हातात होत्या। जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि गावपातळीपासून राज्यपातळी पर्यंत सर्व व्यवस्था ज्यांच्या हातात होती त्यांनी बळीराजाचे शोषण केलं।

पंचायत समित्यात शेततळी योजना आली की ती आपल्या कार्यकर्त्यांना नाहीतर मग आपल्याच घशात घालायची। नवीन बी बियाणं, युरिया आला की आपल्याच मालकीचा करायचा। गावातील विकास सोसायट्यावर सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व मिळवलं आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं।

तू कुणाचा कार्यकर्ता आहे हे बघून सोसायटीचे कर्ज आणि लाभ देण्याची लाजिरवाणी पद्धत आघाडीने रुजवली. समस्थ कारखानदारी आणि साखरसाम्राट हाताशी धरून जागोजाग शेतकऱ्यांना दुर्लक्षित केलं।

आज शेतकरी संपावर गेला हा रोष त्याच सरकारचा आहे ज्यांनी 60 वर्षे सत्ता उपभोगली पण शेतकऱ्यांना एकही सुखाचा घास घेऊ दिला नाही।
आता शेतकरी कर्जमाफी मागतोय त्यावर अनेकजण म्हणतात शरद पवारांनी कर्जमाफी दिली। सोबत बंधूंनो हेही सांगा किती जिल्हा मध्यवर्ती बँका त्यानंतर सावरल्या?  किती शेतकऱ्यांचे कर्ज फिटले? किती शेतकरी समृद्ध झाले? किती जणांना आत्महत्येपासून मुक्ती मिळाली? समोर घोषणा एक करायची आणि मागच्या दारांनी घरं भरून घ्यायची हे 60 वर्षात केलं गेलं।

आजपर्यंत टोमॅटोला भाव नाही म्हणून रानात सडून गेली। कांद्याला भाव नाही म्हणून कांद्याची माती झाली। मिरच्यांची उभी शेती मातीमोल झाली। भेंडी, गवार जनावरांना घालावी लागली। यावेळी बापानं शब्दही उच्चारला नाही म्हणून सरकारही गप्प आणि शोषण सुरूच होतं। आत्ता भाजीपाला, फळे, दूध वाटोळं होतंय म्हणणाऱ्यांनो शेतात 60 वर्षे बाप असा झिजला, मार्केटमध्ये असाच माल टाकून आला, रातरात डोळा लागला नाही। आत्ता तोच माल रस्त्यावर टाकला कारण सरकारला जाग यावी म्हणून।

रात्री झोपताना दरवाजा व्यवस्थित बंद करून पैशाची रास लावणाऱ्यांनो एकदा कशाचाही विचार न करता पैशे काळ्या मातीत पुरण्याचं धाडस करा। हाताशी आलेलं पीक पोटच्या वयात आलेल्या पोरींसारखं सांभाळावं लागतं आणि त्यानंतरही हमीभाव मिळत नाही। एकदा विचार करून बघा।

भारतीय जनता पार्टीला गोत्यात आणण्यासाठी हे कारस्थान आहे अशी नवीन टिमकी सुरू झाली। माझ्या मते भाजपा सरकारने जे 3 वर्षात केले ते 60 वर्षात काँग्रेसने नक्कीच केले नाही मात्र विरोधी पक्षात असताना भाजपा ज्या तोऱ्यात बोलत होती त्या पद्धतीने काम दिसत नाही। शेतकऱ्यांना हवा असलेला मदतीचा हात मिळत नाही, सदाभाऊ त्यासाठी हिजडवाद करत होते त्यात आता ठोस निर्णय घेऊ शकत नाहीत। आता काँग्रेस- राष्ट्रवादीचे सहकार आणि सर्वच बुरुज खिळखिळी झाले तेव्हा अच्छे दिन येण्याची वाट शेतकरी पाहताहेत। दिल्लीपासून गल्लीपर्यंत थेट योजना मिळाली पाहिजे हा एक ध्यास आहे।

आज रस्त्यावर न येता शेतकरी अहिंसा मार्गाने संप करताहेत मात्र त्यांच्या आडून राजकीय पोळी भाजली जातीय का हाही सवाल समोर आहे। जर असं काही घडत असेल तर हे भयानक आहे।

बांधवांनो, जनतेने उभारलेला आणि प्रचंड जनमत पाठीशी असणारा हा लढा आहे दरोडेखोरांना याचा फायदा घेऊ देऊ नका। नाही तर मग पुन्हा "सौ चुहे खा कर बिल्ली चली हज" अशी स्थिती व्हायची। आणि जनमत ढळणार नाही अशा पद्धतीने आपला लढा सुरू ठेवा. सरकार नक्कीच आपल्याला योग्य तो न्याय देईल अशी अपेक्षा आहे।

✍ *विकास विठोबा वाघमारे*
      किसानपुत्र
📱8379977650
सोलापूर


शेतकरी संप

शेतकरी संपामध्ये बंधूंनो मी सहभागी झालो. बांधवांनो कोणत्याही हिंसेच्या मार्गाचा अवलंब करू नका ही विनंती करतोय।
केवळ सत्ताधारी सरकारच्या रोषापायी पुढे आलेला हा संप नक्कीच नाहीय। गेल्या साठ वर्षांमध्ये बळीराजाला बळी जाण्यासाठी आणि देशोधडीला लावणाऱ्या प्रवृत्तीच्या विरुद्ध फुंकलेलं हे रणशिंग आहे.

मी 12 - 13 वर्षाचा होतो तेव्हा करड्याची भाजी घेऊन बाजारात बापासोबत गेलो। तेव्हा दिवसभर उन्हात बसून एक पोतं भाजी विकली आणि हातात 80 रुपये आले। मालाला भाव चांगला लागला की वाईट मला तेव्हा काहीच कळलं नाही। त्यांनतर सातत्याने अनेकवेळा बाजारात जाणं झालं ही विदारक वास्तव मला जाणवत होतं। मात्र जेव्हा या सर्व व्यवस्थेच्या विरोधात होणारी चर्चा ऐकली तेव्हा पडताळणी केली की बळीराजाला कंगाल करणारी ही लोकशाही मार्गाने निवडून आलेली फळी आहे.

मध्यंतरी तेव्हाचे चळवळीतले नेते व आजचे कृषिराज्यमंत्री श्री. सदाभाऊ खोतांची भाषणं ऐकली। तेव्हा आतून पेटून उठलो मात्र तोवर सरकार बदल झाला. आशेचा किरण समोर दिसला. हा संप भाजपाच्या विरोधात किती टक्के आहे मला माहिती नाही मात्र शेतकऱ्यांच्या बाजूने जगण्यासाठी निर्णय घ्या हा विचार घेऊन व्यवस्थेच्या विरोधात केलेला एल्गार नक्कीच आहे.

सदाभाऊ कृषीराज्यमंत्री झाल्यानंतरही अनेकदा आंदोलने झाली तेव्हा खा। राजू शेट्टींनी शेतकऱ्यांचा कांदा व डाळ मंत्रालयासमोर टाकली. मात्र मला विरोधाभास कळत नाही की ज्यासाठी तुम्ही आयुष्यभर लढत आलात आणि जे मुद्दे घेऊन लढत आलात तेच खाते आपल्या हातात असून निर्णय घेऊ शकत नाही। स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणून आंदोलने केली आणि अजून करताय मग हातात असलेल्या पदाचा काय उपयोग? माझ्या शेतकऱ्यांना वेड्यात काढून सत्तेवर बसणाऱ्या सदभाऊंना आगामी काळात याचा हिशोब द्यावा लागेल।

जे जगलं आणि भोगलं ते मांडण्याची लाज मला वाटत नाही. आजपर्यंत 2 रुपये किलो दराने टोमॅटो विकली आणि निव्वळ काही रुपयांमध्ये पोती विकली म्हणजे अक्षरशः लुटलं तेव्हा बापानं रानात टाकून दिलेले कांदे, टोमॅटो आणि जनावराला घातलेली भेंडी, गवार आज रस्त्यावर टाकली हाच फरक आहे.

भाजपा सरकार शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा देईल मात्र कधी कधी आईसुद्धा बाळ रडल्याशिवाय दूध पाजत नसते। बाळ रडताना त्याला मारून गप्प बसवण्याचं वा दुर्लक्ष करण्याचं पाप कृपाकरून करू नका।

बाप मेल्यानंतरच दुःख आणि समोर दिसणारा जिंदगीचा डोंगर आपल्याला कळणार नाही त्यासाठी अनाथ किसानपुत्राला भेटावं लागेल। स्वातंत्र्यानंतर हा सर्वात मोठा लढा ठरावा आणि एकदा बापाच्या पिकाला हमीभाव द्या आणि मागण्या मान्य करा।

कर्जमाफी केल्याने प्रश्न नक्कीच सुटणार नाही मात्र दिलासा मिळेल। शेतात घामाच्या धारांनी पिकवलेला माल सरकार एकदा शेतकऱ्याच्या मनासारखा खरेदी करा। शेतकऱ्यांचं राज्य येऊ द्या एवढीच माफक अपेक्षा हा संप करतो आहे.

या संपाचे राजकारण नक्की होणार नाही। शेतकऱ्यांच्या आडून विरोधकांना राजकारणाचे डोहाळे लागले तर बुडत्याचा पाय खोलात पडेल. हा उद्रेक तुमच्या नाकर्तेपणामुळे घडलाय ।

बांधवांनो संप सुरूच राहुद्या मात्र त्याला हिंसक वळण नको।
फळे, भाजीपाला, दूध रस्त्यावर टाकण्यापेक्षा आपल्या शेतकरी बांधवांना देवाण घेवाण करा।
एका मराठी सिनेमातील एक संवाद आठवला, "सरकार मरण्याचे लाख रुपये देण्यापेक्षा जगण्याचे 10- 15 हजार देत चला।"😢😢😢😢😢😢

© Vikas Waghamare
    किसानपुत्र
📱 8379977650
सोलापूर

सोमवार, २९ मे, २०१७

राज"नीती हरवत चालल्याचे कारण..

सध्या गोहत्या बंदीवरून बरेच वादळ वाहत आहे. केंद्र सरकारने गोहत्या बंदी कायदा लागू केला. नुकताच केरळ या राज्यात काँग्रेसच्या (निष्ठावंत?) नेत्यांनी विरोध म्हणून गाईंची भर रस्त्यावर हत्या करून बीफ खाऊन विरोध केला. राजकारणात काँग्रेसने आजपर्यंत केवळ सत्ता आणि सत्तेचा उपभोग घेतला आणि आता जनतेने आपल्याला डावलल्याने बेभान झालेला हा पक्ष वाटेल ते करतो आहे. हिंदू धर्मात गाय ही पवित्र मानली जाते. गाईला 33 कोटी देवाच्या रूपाने समस्त हिंदू बांधव पूजतात.

     खरंतर काँग्रेसने केलेला हा प्रताप मला खुप काही धक्का देणारा किंवा वाईट वाटणारा नाहीच. टिळकांच्या मृत्यूनंतर भारतीय राजकारणातले टिळकयूग त्या दिवशी संपले आणि गांधीयुगाला त्याच दिवशी सुरवात झाली. 20 व्या शतकात केवळ भारताच्या नाही तर संपूर्ण जगाच्या राजकारणात मोहनदास करमचंद गांधी याव्यक्तीने मोठा ठसा उमटवलाय. अहिंसा आणि सत्याग्रह ह्या दोन नवीन मंत्रांची ओळख त्यांनी जगाला करुन दिली. टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याला देशव्यापी बनवलं.हा लढा ख-या अर्थाने घरोघरी पोहचवला तो गांधीजींनी. महिला, विद्यार्थी,सवर्ण, दलित उच्च-शिक्षीत, मागास असा समाजातला प्रत्येक वर्गाला त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला जोडले. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चार मुद्यांवर त्यांनी ब्रिटीशसाम्राज्याला हादरवून सोडले. अहिंसा या शब्दाची भलीमोठी देणं आपल्या पूर्वजांनी आपल्या पदरी टाकली आहे हेच आज काँग्रेसच्या लक्षात नाही. गलिच्छ व निच पद्धतीचे राजकारण कशा पद्धतीने केले जाऊ शकते याचे उत्तम उदाहरण जगासमोर मांडण्याचे पाप त्यांनी केले आहे. राजकारणात जय - पराजय आणि बेरीज - वजा हे अटळ असतं. रुपया वर फेकला आहेच तर छाप किंवा काटा एकच पडणार हे निश्चित असतं.

गांधीजींना अभिप्रेत असलेली काँग्रेस आज त्याच गांधी घराण्याने जिवंत ठेवली नाही. राजकारणात मोदींना घेरण्याचे पराकोटीचे प्रयोजन करता करता गायही विरोधक वाटू लागली अर्थात हिंदूही. बीफ खाणं हा ज्याच्या त्याच्या संस्कृतीचा किंवा संस्काराचा भाग आहे असं म्हणूया. केवळ हिंदूंना विरोध करून राजकीय नीती खुंटीला टांगण्याचा प्रयोग करून झाला. ज्या हाताने गोमाता कापली गेली तो "हात" आता कोणत्याही राज्यात निवडून येईल अशी पुसटशीही आशा राहिली नाही.

लोकशाहीत स्वातंत्र्य आहे म्हणून हे कृत्य केलं असेल तर बहाद्दर म्हणायला हरकत नाही मात्र समस्त हिंदू बंधूंच्या भावनांना रस्त्यावर पायदळी तुडवत केलेला हा विरोध म्हणजे काँग्रेसने आत्मघातकी पाऊल टाकलं आहे. आगीतून फुपाट्यात पडणे म्हणजे काय ? हे आता जनतेला उमगलं असेल.
शास्त्राने गोमाता कशी आणि किती प्रकारे उपयोगी आहे हे सिद्ध करून दिले मात्र राजकीय गोळाबेरीज करण्याच्या हेतूने काय साध्य केलं असेल. केरळमध्ये असलेले सरकार हे विकासाच्या आणि परिवर्तनाच्या विरोधात आहे. कम्युनिष्ठ नेत्यांनी आजवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या हजारो कार्यकर्त्यांच्या, पूर्णवेळांच्या व प्रचारकांच्या हत्या केल्या आणि सुरूच आहेत. आता काँग्रेसने त्याच राज्यात खुलेआम गोहत्या केल्या हे नवल नाही मात्र हे नीच पद्धतीचे पाऊल अहिंसावादीचा संदेश जगाला देणाऱ्या पक्षाने उचलले हे गंभीर आहे.

एके काळी गाय आणि वासरू हे चिन्ह घेऊन पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधी यासुद्धा निश्चितच हतबल झाल्या असतील. जर हिंदू धर्माला विरोध करायचा तर मोकळ्या पद्धतीने नक्कीच करा तो अधिकार आहे मात्र अशा विशिष्ठ धर्माला प्रिय असलेल्या प्राण्यांची हत्या करून राजकीय दुकानदारी डागडुजी करण्याचे महापाप म्हणजे स्वतःहून उध्वस्त होणे आहे. लोकशाही मान्य नसलेल्या डाव्यांच्या आणि हिंसावादी काँग्रेसमध्ये काडीचाही फरक नाही आणि आता पक्षाला स्वतःहून संपण्याचे वेध लागले आहेत. विनाकारण टोकाचा राजकीय विरोध करत आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारेपर्यंत द्वेष करतो आहोत हे कधी लक्षात येणार देव जाणे! नाही म्हणायला तर आता त्यांच्या नेत्यांची गणना केली तर मी महात्मा गांधीपासून युवराज राहूल गांधी यांच्यापर्यंतच येऊन थांबतो. (थांबावं लागतं). सत्तेची नशा उतरली असली तरी नौका दिशाहीन होऊन भलत्याच वादळात फसते आहे हे खरं!

✍ विकास विठोबा वाघमारे
📱 8379977650
सोलापूर





रविवार, २८ मे, २०१७

पावसाळी सपानं...

नभ हे झिम्माड झिम्माड
डोळयात ओघळते सर।
येतो पावसाळा बावरा
रेंगाळते तू घरभर।

पाणी पाणी गं काळजाचे
आभाळ ही अंगाई गाते।
झुडपं शहारली रानी
माती हिरवं गाणं गाते।

काळजातला तुझ्या माझ्या
भाव ओठी गं सांडलेला।
ऊन पावसाचा कहर
खेळ रुपेरी मांडलेला।

सर झिम्माड तुझी माझी
उधळली गं रानोमाळ।
लांबते अंतर गुलाबी
मनात भिजतो गं काळ।

तुझ्या उधानल्या रूपाचं
रुजवलं प्रेम मातीत।
सये पावसाळी सपानं
जळतं भिजल्या वातीत।

© Vikas Waghamare
📱8379977650
सोलापूर


प्रेम

💞 आभाळानं धरतीला मिठीत घ्यावं.... 💞
💞 ढगांनी मनापासून पाणी व्हावं...💞
💞 पाखरांनी हृदयातून गाणं गावं...💞
💞 पाण्यानं होडीला पुढं न्यावं....💞

तुला आठवतं? त्या बाभळीच्या झाडाला टेकून बसलो. पिवळं फुल हुंगलं तेव्हा मोगऱ्यासारखा सुगंध दरवळत होता. उन्हात आभाळ भरून आलेलं अन मनही. तेव्हा....

तू विचारलेलंस "ते पावसात सोडलेल्या होड्यांचं पुढं काय होतं?"
खरंतर ते मलाही माहिती नव्हतं. मात्र एखादी होडी लहानपणी मीही सोडलेली त्या अनाहूत पाण्यात... वाहत गेली लांब आणि मग दगड गोट्यात जाऊन अडखळून तिचा अंत वगैरे झाला. प्रत्येकांनी सोडलेली ती होडी अडखळायची, बुडायची आणि मला आनंद व्हायचा.

कुणाच्या तरी नावाने ती होडी सोडलेली असते असं जेव्हा मला कळलं तेव्हा मात्र भरून आलं. पावसाळ्यातील भिजण्या- थिरकण्याचा खेळ आम्ही आनंदाने खेळायचो.

पुढे अशा अनेक होडींना किनारा मिळाला नाही। निरागस होतं मन म्हणून होडी दामटल्या. पण ते नावाने होड्या खरंच सोडतात का ? या प्रश्नाचं उत्तर वगैरे शोधणं मला तर आवडलं नाही.
पण तुला एक विचारू ?

...."अगं, त्या पावसात सोडलेल्या होड्यांचं पुढं काय होतं...?"😢😢😢😢

© Vikas Waghamare
📱8379977650
Solapur